*आदर्श कॉलनीतील विविध समस्या सोडवा नागरिकांची मागणी*
परतुर/( प्रतिनिधी) शहरातील आदर्श कॉलनी परिसरातील नागरिकांनी विविध मागण्या सोडवण्यासाठी निवेदन जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांना दिले. कित्येक वर्षापासून आदर्श कॉलनी येथे समस्यांच्या विळखा पडला असून कुठल्याही प्रतिनिधीनी याकडे लक्ष दिले नाही
म्हणून येथील नागरिकांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अग्रवाल यांच्याकडे विविध समस्या सोडवण्याकरिता निवेदनाद्वारे मागणी केली. यामध्ये लालजी निर्वळ, अरुणराव साबळे, चंद्रकांत सावंत, ठाकर सर रामेश्वर दिरंगे प्रकाश अंभोरे ,दत्तात्रय काशीद ,विशाल राऊत, विलासराव सुर्वे झरेकर सर दीपक , बोराडे सर इत्यादी नागरिकांनी या परिसरातील नागरी समस्या बाबत निवेदन देऊन समस्या पूर्ण करून देण्याची मागणी केली यावेळेस त्यांच्यासमवेत शहर प्रमुख दीपक हिवाळे होते.