मंगळवेढा –
राज्यात सद्य:स्थितीत 244 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 1.65 लाख कोटी रुपयांची गरज आहे. भू-संपादन, वन व पर्यावरणाची मान्यता आणि प्रकल्पग्रस्थांचे पुनर्वसन रखडल्यामुळे विलंब लागत आहे.रखडलेल्या पाणी योजनेसाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा असे प्रतिपादन पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे यांनी केले.
13 दुष्काळी तालुक्याची पाणी परिषद मंगळवेढ्यात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी राजश्री शाहू महाराज क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आ. समाधान आवताडे, डॉ. बाबासाहेब देशमुख ,माजी आमदार विक्रम सावंत,राजेंद्र देशमुख,गौरव नाईकवडी,वैभव नायकवडी ,डॉ. अनिकेत देशमुख,विशंभर बाबर, अँड सुभाष पाटील
अँड सरफराज बागवान,अँड भारत पवार प्रा.दत्ताजीराव जाधव, अँड. बिराप्पा जाधव,तुकाराम बाबा महाराज,शोभाताई काळुंगे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काळुंगे पुढे म्हणाले की, क्रांतिवीर डॉ. नागनाथ नायकवडी, स्व. गणपतराव देशमुख, स्व. आर. आर. पाटील, स्व. निळूभाऊ फुले यांच्यासारखी माणसं आज हयात नाहीत. त्यांनी जिवंतपणी रस्त्यावर उतरून लढा दिला. त्यांच्या सोबतीने पाणी संघर्ष चळवळीतील सर्व नेते-कार्यकर्ते यांनी ही चळवळ धगधगत्या अंगारासारखी 34 वर्षे फुलवत ठेवली. त्याचा हा अभूतपूर्व इतिहास आहे.20 वर्षात मंगळवेढा उपसासिंचन योजनेस फक्त 60 कोटींची तरतूद झाली. या गतीने काम झाल्यास अजून दहा वर्षे वाट पाहावी लागेल. त्यासाठी विधानभवनात आज जे दुष्काळी भागाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत व भविष्यात जे करणार आहेत, त्यांनी वरील मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष केला पाहिजे.
निमंत्रक वैभव नाईकवाडी म्हणाले की,नागन्नाथ आण्णा व भाई गणपतराव देशमुख यांच्या चळवळीतून अनेक योजना मार्गी लागल्या आणि अजूनही काही तालुके तहानेने व्याकूळ आहेत. गेल्या 34 वर्षांत लढा दिला . कार्यक्रमाचे प्रास्ताविकात नायकवाडी यांनी केले.यावेळी
आ. समाधन आवताडे,आ डॉ. बाबासाहेब देशमुख ,माजी आमदार विक्रम सावंत,राजेंद्र देशमुख,गौरव नाईकवडी,बाळासाहेब नायकवडी डॉ. अमिकेत देशमुख यासह मान्यवराची भाषणे झाली
—-चाैकट
या कामासाठीचे ठराव मंजूर
म्हैसाळचे मंगळवेढा, सांगोला व जतमधील अर्धवट कामे पुर्ण करणे. सांगली व सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील प्रकल्प अजून रखडलेले . तासगाव, आटपाडी, सांगोल्यातील टेंभूचे काम पूर्ण व्हायचे आहे. टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीतून मंगळवेढ्यापर्यंत आण. भीमा, माण व कोरडा नदीवर बॅरेजेस यासाठी 30 मंजूर केले. तर 35 वी पाणी परिषद आटपाडी येथे घेण्याचा निर्णय झाला.
Post Views: 8