करमाळा

राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषद लखनऊ एवं नवी दिल्ली च्या स्थापना दिनाचा एक भव्य कार्यक्रम, राष्ट्रीय अधिवेशन आणि पत्रकार सन्मान समारंभ विश्वेश्वरय्या सभागृह, राजभवन गेट, लखनौ येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, कारागृह एवं जेल मंत्री सुरेश राही, राष्ट्रीय अधीक्षक देवेंद्र कुमार मिश्रा उपस्थित होते.या वेळेस राज्य ब्युरो चीफ संजय मस्कर यांची राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. आणि संरक्षण कायदा तुमच्या पाठीशी राहील, असा सल्ला दिला. संजय मस्कर हे साङे तालुका करमाळा येथील रहिवाशी आहेत, त्यांनी जनरॅलिझम अँड मास कम्युनेकेशन ङिप्लोमा नंतर सलग 17 वर्ष पत्रकारीता केलेली आहे,
राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र कुमार मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील आयोजित या ऐतिहासिक कार्यक्रमात देशातील विविध राज्यातील हजारो पत्रकारांनी सहभाग घेऊन संघटनेची एकजूट आणि ताकद दाखवून दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री ब्रिजेश पाठक व तुरूंग मंत्री सुरेश राही व बहुसंख्येने आमदार व खासदार उपस्थित होते. पत्रकारांच्या समस्या आणि मागण्या गांभीर्याने ऐकून घेत, पत्रकारांच्या हिताचे आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक म्हणाले की, पत्रकार हा समाजाचा चौथा आधारस्तंभ असून, ते प्रत्येक लहान-मोठी घटना खेड्यापासून शहरांपर्यंत जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. ते म्हणाले की, तळागाळात काम करणारे पत्रकार सत्य समोर आणण्यासाठी अनेकदा आपला जीव धोक्यात घालतात आणि सरकार त्यांच्या योगदानाचा आदर करते.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्रकुमार मिश्रा म्हणाले कि आम्ही पत्रकारासांठी सरकारी दरबारात अनेक मांगण्यासाठी पाठपुरावा करत आहोत, मुला,मुलींना मोफत शिक्षण, आरोग्य विमा, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, पत्रकारांचा 50 लाख रुपयांचा अपघात विमा, पत्रकारांच्या वाहनांना टोल टॅक्समधून मुक्त करणे, खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या घटना थांबवणे या महत्त्वाच्या मागण्यांचा त्यात समावेश आहे.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे पुष्पहार, स्मृतीचिन्ह देवून स्वागत करण्यात आले.
समारोपाच्या समारोपप्रसंगी विविध राज्यातील पत्रकारांचा राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र कुमार मिश्रा व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात पत्रकार एकता, सुरक्षितता आणि हक्काचा आवाज बुलंद करण्यात आला आणि पत्रकारांच्या हितासाठी संघटनेची बांधिलकी स्पष्टपणे दिसून आली.