भंडारा जिल्ह्यातील आंबागड येथे अनुदानित आश्रम शाळा असून १ ते १० पर्यंत वर्ग आहेत. पण या १० वर्गाला शिकवण्यासाठी फक्त दोनच शिक्षक असल्याने आदीवासी विदयार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरु आहे. तर तीन खोल्यांमध्ये १ ते १० वर्गातील विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत असून दिवसभर शाळा तर रात्री हॉस्टेल अशी परिस्थिती असून मुलींकरिता महिला अधीक्षक नसल्याने संस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आदीवासी समाजांची लोकसंख्या जास्त आहे. तालुक्यातील आंबागड येथे स्वामी समर्थ प्राथमिक माध्यमिक आदीवासी आश्रम शाळा आहे, या ठिकाणी १ ते १० पर्यंत वर्ग आहेत. एकूण विद्यार्थी संख्या ३७ आहे, महत्वाची बाब म्हणजे १ ते १० वर्गाला शिकविण्यासाठी फक्त दोनच शिक्षक आहे, मग हे दोन शिक्षक १० वर्गाना कसे शिक्षण देत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. दुसरीकडे १० वर्गाकरिता तीन खोल्या आहेत, एका खोलीत १ ते ४ वर्ग भरतात आणि एक शिक्षक एकाच वेळी चार वर्गाना शिक्षण देतो तरी कस असा प्रश्न पडत आहे, तर दुपारी त्याच खोलीत वर्ग भरतात व रात्री इथेच राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, महत्वाची बाब म्हणजे या आदीवासी आश्रम शाळेत मुली देखील आहेत पण देखरेख करीता अधीक्षकचं नाही मग या मुलींची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येते. एकीकडे आदीवासी समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यायला पाहिजे म्हणून शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. पण १० वर्गाना शिकविण्यासाठी दोन शिक्षक असल्याने आदीवासी मुलांचा भवितव्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे, तर या शाळेचा आणखी एक प्रताप म्हणजे प्रकाश मडावी यांच्या दोन मुली मागील वर्षी याच शाळेत शिक्षण घेत होत्या पण प्रकाश यांनी इथली व्यवस्था पाहून आपल्या दोन्ही मुलींना दुसऱ्या शाळेत दाखल केले आहे, तरी पण त्या दोन मुलींची ऍडमिशन याच शाळेतील हजेरी पटावर आहे.
तर दुसरीकडे एक धक्कादायक बाब शाळा सुरु करण्यासाठी udise ( Unified District Information System for education ) नंबर आवश्यक असतो त्यानंतरच प्रत्येक विद्यार्थ्याला पुढील वर्षात दाखल मिळतो मात्र या ठिकाणी तर udise नुंबरच नसल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे आदीवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान झाले तर आदीवासी संघटना आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.