22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाचा अभिषेक झाल्यानंतर प्रत्येक भक्त त्यांच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. रामानंद सागर यांची रामायण ही लोकप्रिय टेलिव्हिजन मालिका जी 1987 मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाली होती. त्यावेळी रामायण या मालिकेने सर्वांच्याच मनावर राज्य केले होते.
अशातच आता रामायण ही मालिका पुन्हा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘रामायण’ ही मालिका डीडी नॅशनलवर प्रसारित होणार आहे. नुकतीच याबाबत दूरदर्शन नॅशनलच्या (डीडी नॅशनल) अधिकृत X हँडलवर माहिती देण्यात आली आहे.
रामायण मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यानं आता प्रेक्षकांना आनंद झाला आहे.