माहूर तालुका प्रतिनिधी
बजरंगसिंह हजारी
दि.२२ ऑगस्ट
नगराध्यक्ष म्हणून सुरुवातीची अडीच वर्षे कार्यकाळ पूर्ण केल्यावर, माहूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी दैवयोगाने मोलाची संधी मिळालेले विकासपुरुष, सर्वधर्मसमभाव जोपासत दोन टर्म नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ सांभाळत शहरात विकासाची गंगा आणून आपला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केलेले नगराध्यक्ष फिरोज हाजी कादर दोसानी यांच्या संकल्पनेतून स्वखर्चाने राष्ट्रीय महामार्गावरील ७० पेक्षा जास्त विद्युत खांबावर आकर्षक आणि मनमोहक असे चकाकणारे “इलेक्ट्रिक राष्ट्रध्वज” फडकविण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने शहरवासी सर्वधर्मीय नागरिक तथा भाविक नगराध्यक्ष दोसानी यांचे सहर्ष अभिनंदन करताना दिसत आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गेले दोन टर्म यशस्वीरित्या नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण करून देवयोगाने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशाने पुढील अडीच वर्ष कायम नगराध्यक्ष राहण्याचा बहुमान मिळविलेले तसेच नगराध्यक्ष पदाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याच्या मार्गावर विकास गंगे सोबत घोडदौड सुरू केलेले
नगराध्यक्ष फिरोज हाजी कादर दोसानी यांनी माहूर शहराचा कायापालट करण्याचा मानस उराशी बाळगून माहूरच्या इतिहासात नोंद घेण्याजोगी अनेक विकास कामे पूर्णत्वास नेली असून नामदार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातल्या माहूर शहरात वृक्षारोपणाची क्रांती घडवून आणण्यासाठी आग्रही असलेले फिरोज दोसानी यांनी माहूर शहरात जलक्रांती घडवीत नळ योजनेचे पाणी तळपत्या उन्हाळ्यात घरोघरी पोहोचवत पाणी टंचाईच जाणवू दिली
नसल्याने तसेच माहूर शहरातील भोजंती तलावात पाणी साठवणूक करून कोट्यावधि रुपयाची विकास कामे सुरू करून माहूरच्या नावलौकिकात भर टाकल्याने आज शहरातील वी हीरी कुपनलिकांची पाणी पातळी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढविल्याने गेल्या उन्हाळ्यात माहुर वासी यांना अजिबात पाणीटंचाई जाणविली नसल्याने खरोखरचा विकास पुरुष म्हणून जनतेच्या मनातून त्यांनी शाबासकी मिळविलेली आहे
विकास करताना काही तरी वेगळे करून माहूर वासीयासह येणाऱ्या भाविकांना सर्व सुविधा मिळाव्या यासाठी नेहमी प्रयत्न करत असलेले नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी राष्ट्रभक्ती सर्वप्रथम मानत आपल्या समाजकार्याची सुरुवात केली होती गेल्या १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज फडकविण्याचे राहिल्याने त्यांनी माहूर शहरातून गडावर जाणाऱ्या विद्युत खांबावर इलेक्ट्रिक वायर द्वारे राष्ट्रध्वज चमकवीला परंतु राष्ट्रीय महामार्ग वरील विद्युत खांबांना विद्युत पुरवठा झाला नसल्याने दिनांक १७ रोजी सर्व खांबावर राष्ट्रध्वज चमकवून विद्युत पुरवठा सुरू होऊन पथदिव्यांच्या लखलखटात राष्ट्रध्वज खांबावर चमकत असल्याने त्यांनी स्वखर्चातून केलेल्या या उपक्रमाचे शहरवासीयासह परिक्रमा यात्रे निमित्त आलेले सर्व अधिकारी कर्मचारी आणि लाखो भाविक भक्तातून नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांच्या या अभिनव राष्ट्रभक्तीपर उपक्रमांचे अभिनंदन करत आहेत.