तभा फ्लॅश न्यूज : कोसमेट (ता. उमरगा) येथील एका शेतात कोळपणी करत असताना विद्युत महावितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे मोठा अपघात घडला. विजेच्या तणावात उतरण्यामुळे शेतकऱ्याच्या बैलाचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. अंदाजे ५० हजार रुपये किमतीचा हा बैल शेतकरी बालाजी शेषेराव वाघमारे यांचा होता.
दुपारी झालेल्या या घटनेत बालाजी वाघमारे यांनी बैलजोडीच्या मदतीने आपल्या शेतात पाच कोळपे धरून कोळपणी सुरू केली होती. त्यावेळी संदीप मॅकलवाड, नरसिंह जामगेवाड, दिगांबर मॅकलवाड आणि सुदाम अक्कमवाड हे कामगार त्यांना मदत करत होते.
शेतातच असलेल्या विद्युत खांबामधून तणावित वीज प्रवाहित झाल्याने एक कोळप शॉकच्या संपर्कात आला आणि त्याचा फटका बैलाला बसला. विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने बैल जागीच कोसळून मृत झाला. सुदैवाने शेतात काम करणारे इतर पाच मजूर वेळीच बाजूला झाले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
ही घटना समजताच परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिकांनी महावितरण विभागाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान भरून द्यावे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि शेतकऱ्याच्या नुकसानीसाठी भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697