सोलापूर – मी एवढेच केले हसलो मनाप्रमाणे, रडलो मनाप्रमाणे, जगलो मनाप्रमाणे, कवितेत जन्म झाला कवीतेत अंत झाला. या व अन्य कविता सादर करीत सोबतीचा करार या कार्यक्रमातून गायक दत्तप्रसाद रानडे आणि कवी वैभव जोशी यांनी तीन दिवसीय गझल महोत्सवाचा समारोप केला.
सोलापूरचे सुपुत्र कवी वैभव जोशी यांनी आपल्या कविता सादर करताना कवीचे आयुष्य सोपे असते असे सांगून शब्द माझा कबीर झाला. ही कविता त्याच बरोबर प्रेमी युगलांवरील अनेक कविताही त्यांनी सादर केल्या. खरे हसणे कुठे गेले ऋतुचा हात धरूनी आपले फुलणे कुठे गेले जुन्या फोटोत दिसणारे खरे असणे कुठे गेले स्वतःचा वाटणारा चेहरा हा चेहरा नाही अरे या आरशातील कालचे असणे कुठे गेले ही कविता सादर केल्यानंतर रसिक श्रोत्यांनी चांगलीच दाद दिली.
तर गायक दत्तप्रसाद रानडे यांनी हसलो मनाप्रमाणे, काय सांगायचे, तू धुक्यासारखी मी उन्हासारखा, आठवण., शेवटी काही, आई, धीरे धीरे, मोजकी उन्हे, गझल एैकून ती म्हणते, त्या क्षणी, शेवटी शेवटी आणि विठ्ठल ही गीते सादर करून सभागृहात महौल तयार केला. या कवी आणि गायकांच्या सोबतीच्या करार या कार्यक्रमासाठी संगित दिग्दर्शन आशिष मुजुमदार यांनी केले तर हार्मोनियमवर निनाद सोलापूरकर, गिटार मिलिंद शेवारे, तबला समीर शिवगार, ढोलक अमोद कुलकर्णी यांनी साथ संगत केली तर या कार्यक्रमाचे निर्माते शैलेश नांदुरकर होते.
तीनही दिवसामध्ये रसिक श्रोत्यांनी या गझल महोत्सवाला मोठी गर्दी केली होती. या तीन दिवशीय गझल महोत्सवाचे नेटके आयोजन आणि रंगमंचावरील सजावट समन्वयक अमोल धाबळे यांनी केले. या तीन दिवसातील गझल महोत्सवाला सांस्कृतिक विभागाच्या अधिक्षक जानव्ही जानकर, उद्योगपती दत्ताआण्णा सुरवसे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
















