दि.2ं फेब्रुवारी- लातूर शहरातील गरूड चौक भागामध्ये असलेल्या एका बंद दुकानाला मध्यरात्री आकरा वाजण्याच्या सुमारात आग लागल्याची घटना घडली आहे. अग्नीशमन दलाच्या कार्य तत्परतेमुळे ही आग आटोक्यात आली आहे. या बाबतची माहीती अशी की, लातूर शहरातील गरुड चौक भागामध्ये असलेल्या एका बंद दुकानाला गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी घटनास्थळावरून तात्काळ अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामन दलही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आणि आग आटोक्यात आणली. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तर या घटनेमध्ये, जिवित वित्तहानी याची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...