शहरात सुरू वारंवार असलेल्या अपघाताच्या सत्रानंतर जडवाहनां विरोधात नागरिकांनी कृती समितीच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेतला. शहरवासियांच्या आक्रमक भूमिकेनंतर जड वाहतुकीवर दिवसा बंदी घालण्यात आली. पोलीस आयुक्तांनी तसा आदेश काढून सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत जड वाहनाना शहरात प्रवेश द्यायचा नाही असे सूचित केले. दरम्यान या आदेशानंतर सुद्धा शहरात आलेल्या विविध जड वाहनावर पोलिसांनी कारवाई केल्याचे दिसून येत आहे. मालट्रक, गैस सिलेंडर ट्रक अशा विविध वाहनाना कारवाईला सामोरे जावे लागले. एकंदरीत शहरात दिवसा जडवाहतूक बंद केल्याने अनेक वाहने शहराच्या बाहेरच थांबावल्याचे चित्र दिसून आले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























