जालना – पारध जालना जिल्ह्यातील तालुका भोकरदन पारध येथील स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कुल कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय येथे भारताचे संविधाननिर्माते, प्रज्ञासूर्य, मानवतावादी विचारांचे महान पुरस्कर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात अभिवादन व स्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्यांची जाणीव, संविधानाची ओळख आणि प्रेरणादायी नेतृत्वाचे गुण दृढ करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य पद्धतीने पार पडले
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे शाळेचे सहशिक्षक श्री. संतोष सोनवणे सर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक श्री. लक्कस सर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी सामूहिकरित्या मौन पाळून महापुरुषांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केले
पूजनानंतर इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी वंशिका तेलंग्रे आणि श्रद्धा लक्कस यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनगौरवाचे वर्णन करणारे भावस्पर्शी आणि प्रेरणादायी गीत सादर केले. त्यांचे सादरीकरण ऐकताना उपस्थित प्रेक्षकांच्या मनात आदर, अभिमान आणि राष्ट्रभावनेची अनुभूती दाटून आली
पुढे शाळेतील विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांच्या संघर्षपूर्ण प्रवासावर, सामाजिक समतेसाठीच्या त्यांच्या भव्य कार्यावर आणि भारतीय संविधान निर्मितीतल्या त्यांच्या योगदानावर प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या भाषणांतून डॉ. आंबेडकरांचे शिक्षणावरील प्रेम, महिलांच्या प्रगतीसाठीचे प्रयत्न, अस्पृश्यता निर्मूलनासाठीची झुंज तसेच “ज्ञान हेच खरे शक्तीस्थान” हा त्यांचा मूलमंत्र विद्यार्थ्यांच्या शब्दांतून उजागर झाला.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. लक्कस सर यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेबांचे चरित्र आणि कार्य केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून ते आजच्या पिढीसाठीही मार्गदर्शक असल्याचे सांगितले.
“डॉ. बाबासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन, त्याच शिक्षणाच्या बळावर जगातील महत्त्वाचे संविधान घडवले. त्यांच्या परिश्रमाची, जिद्दीची आणि दूरदृष्टीची प्रेरणा प्रत्येक विद्यार्थ्याने मनात ठेवली पाहिजे,” असे ते म्हणाले
प्रमुख पाहुणे श्री. संतोष सोनवणे सर यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्यांची माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
“संविधानाची खरी शक्ती केवळ त्याच्या लिखाणात नसून त्याची अंमलबजावणी करणाऱ्या जागरूक नागरिकांमध्ये आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील विद्यार्थी प्रणव काटोले यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आणि योग्य शब्दांत पार पाडले. त्यांच्या निवेदनातून कार्यक्रम अधिक आकर्षक आणि सुबोध झाला.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक—तबडे सर, सोनवणे सर, पाखरे सर, लोखंडे सर तसेच सहशिक्षिका झोरे मॅडम, राऊत मॅडम, भारती मॅडम आणि नरोटे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी शिस्त, सजावट, सांस्कृतिक सादरीकरण व नियोजन यामध्ये शिक्षकांचे विशेष योगदान होते
समारोपाच्या भाषणात सूर्यकांत गालफाडे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या सर्वसमावेशक विचारांना उजाळा देत
“भारत देश सर्वधर्मसमभावामुळेच महान बनतो”
हा मूलभूत संदेश विद्यार्थ्यांच्या मनात दृढ केला

























