बा-हाळी – पालकांनी आपल्या पाल्यांना शैक्षणिक, सामाजिक जडणघडणीत मोलाचा सहभाग घेत आदर्श नागरिक घडवावेत असे मत विजय देशपांडे यांनी व्यक्त केले.
वै. भाऊसाहेब देशपांडे यांच्या आठव्या पुण्यस्मरण निमित्य आयोजित विद्यार्थी पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई देशपांडे तर प्रमुख अतिथी म्हणून ॲड मूरारजी देशपांडे ,मल्हारराव देशपांडे, प्राचार्य अशोक पंचगट्टे उपस्थित होते .प्रारंभी विद्या विकास विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या वै.भाऊसाहेब देशपांडे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीमती विजयाताई देशपांडे म्हणाल्या की वै. भाऊसाहेब देशपांडे यांनी विद्या विकास विद्यालयाच्या लावलेल्या रोपट्यांचे रूपांतर विशाल वटवृक्षात झाले असून असंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहेत.
राजकीय ,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात आघाडीवर आहेत. पालकांनी आपल्या पाल्यास केवळ शाळेच्या नावावर न सोडता आपणही त्याची प्रगती ,त्याची उपस्थिती,अभ्यास याची माहिती घेत त्याला योग्य ते वळण लावण्यासाठी शिक्षकांना हातभार लावावा .विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या मोहोजाळात न फसता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला .याप्रसंगी अँड. मुरारजी देशपांडे ,मल्हारराव देशपांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.शिरीष लव्हेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य अशोक पंचगट्टे उपप्राचार्य तानाजी दावलपुरे पर्यवेक्षक प्रशांत जोशी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.























