पंढरपूर – दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. पंढरपूर नगर परिषदे मध्ये देखील जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परंतु यावेळी राज्यगीताचे गायन अथवा वादन करण्यात आले नाही. महाराष्ट्र शासनाने केलेल्या निर्णयाची पायमल्ली करण्यात आली. याबाबतचा खुलासा पंढरपूर नगरपरिषदेकडून करण्यात यावा, तसेच यापुढे कोणत्याही शासकीय कार्यक्रमाच्या अगोदर राज्य गीताचे गायन अवश्य व्हावे, अशी मागणी भाजपचे पंढरपूर शहराध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
याप्रसंगी शहराध्यक्ष विक्रम शिरसाठ, नगरसेवक विनायक संगीत राव, नगरसेवक सौरभ थिटे, शिवभक्त बंटी वाघ,दत्तराज साळुंखे, समाजसेवक शंकर सुरवसे, श्रीनाथ संगीतराव आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य शासनाने एक फेब्रुवारी २०२३ रोजी शासन निर्णय काढून प्रत्येक शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्र गीत गायले जावे असा नियम लागू केला आहे. या नियमाची पायमल्ली पंढरपूर नगरपरिषदेने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिनी केली आहे. यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. याबाबतचा खुलासा पंढरपूर नगरपरिषदेने करावा, अशी मागणी भाजपचे पंढरपूर शहराध्यक्ष विक्रम शिरसाट यांच्याकडून करण्यात आली आहे.
दरम्यान यापुढे कुठल्याही शासकीय कार्यक्रमात राज्य गीताचे गायन अवश्य करण्यात यावे अशी मागणी ही याप्रसंगी करण्यात आली आहे.
























