सोलापूर – जगात सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या पार्श्वभूमीवर काही पक्ष व संघटना इराणच्या समर्थनार्थ मोर्चाचे नियोजन करून शहरातील सामाजिक सलोखा व शांतता बाधित करण्याचा प्रयत्न करत असून त्या मोर्चांना परवानगी देऊ नये असे अशी मागणी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका अलका भवर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, या युद्धात सहभागी सर्वच राष्ट्राचे नुकसान होत असून, इराण वर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देऊन भारतात काही लोक आंदोलने करत आहेत, सोलापुरात देखील अशा मोर्चा करण्याचा काही समाजकंटकांचा मानस असून, त्यांचा शहरातील सामाजिक सलोखा व शांतता बाधित करण्याचा प्रयत्न करत असून, ज्या पद्धतीने इराण राष्ट्राला या युद्धाचा फटका बसला आहे, तसाच फटका इजराइल या राष्ट्राला देखील बसलेला असून, जर आज इराण समर्थनार्थ मोर्चा निघाला तर उद्या इजराइल राष्ट्रावर झालेल्या हल्ल्यात देखील अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झालेला आहे व इजराइल राष्ट्राने आतपर्यंत अनेक वेळा भारताला मदत केलेली असून, इजराइल समर्थनार्थ देखील मोर्चे निघतील. यामध्ये सामाजिक सलोखा व शांतता भंग होऊ नये याची काळजी घेण्यासाठी कोणत्याच मोर्चांना परवानगी तर देऊच नये, व कोणी असे मोर्चे काढून शांतता बाधित करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी आनंद भवर, धनंजय काकडे, अतुल शेंडगे, प्रभाकर क्षीरसागर, नागेश सुरवसे, किशोर खडके यांची उपस्थिती होती.






















