सोलापूर – “समाजात केवळ माहितीचा साठा असून चालत नाही, तर त्या ज्ञानाच्या चांगुलपणाची बेरीज होणे काळाची गरज आहे,” असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज (सोलापूर) आणि शिक्षण प्रसारक मंडळ (अकलूज) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील स्मृती व्याख्यानमालेत’ ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी सुरुवातीला मनोगतामध्ये सर्वाचे स्वागत करीत या व्याख्यानमालेचा उद्देश सांगताना व्यक्तीपूजेपेक्षा विचारांची पूजा महत्त्वाची हि अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, “आजच्या काळात व्यक्तीपूजेपेक्षा विचारांची पूजा करणे अधिक महत्त्वाचे आहे. थोर व्यक्तींचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना खरी महापुरुषांना आदरांजली ठरेल.”
* डॉ. सबनीस यांनी आपल्या शैलीत तडफदार आणि प्रभावी मांडणी करत उपस्थितांची मने जिंकली.
*सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.*
संवादाची संस्कृती जपण्याचे आवाहन करीत डॉ. सबनीस म्हणाले की, “आजच्या डिजिटल युगात आपण माहितीने समृद्ध आहोत, पण संवाद हरवत चालला आहे. समाजात द्वेष संपवून प्रेमाच्या आणि ज्ञानाच्या चांगुलपणाची बेरीज झाली, तरच खऱ्या अर्थाने सुसंस्कृत समाज घडेल.”
महापुरुषांच्या विचारांची प्रासंगिकता समजून घ्यावी लागेल छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महात्मा फुले, महात्मा गांधी डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या महापुरुषांनी नेहमीच जनहिताला प्राधान्य दिले. त्यांचे विचार केवळ पुस्तकात न ठेवता ते जगण्यात उतरवणे गरजेचे आहे.
शिक्षणाचा हेतू केवळ नोकरी मिळवणे हा नसून, एक चांगला माणूस घडवणे हा असावा. विद्यार्थ्यांनी चिकित्सक वृत्ती जोपासावी आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करावा, त्यासाठी सामाजीक भान यायला हवे असे आवाहन त्यांनी केले.
*सहकार महर्षींच्या कार्याचा गौर करताना”सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी ग्रामीण भागात ज्ञानाची आणि सहकाराची जी गंगा आणली, तिचे जतन करणे हीच त्यांच्या स्मृतींना खरी आदरांजली ठरेल,” असे सांगत त्यांनी मोहिते-पाटील यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले.*
* विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती
या सोहळ्याला शिक्षण क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती, ज्यात प्रामुख्याने:
* श्री. मनोहर सपाटे (अध्यक्ष, छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था)
* डॉ. अतुल लकडे (रजिस्ट्रार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ)
* सौ. वासंती सबनीस
* श्री. अभिजित रणवरे (सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज)
* श्री. हर्षवर्धन खराडे (सहसचिव)
* श्री. महेश माने (सिनेट सदस्य)
यांसोबतच प्रा. मोटे, सचिन गायकवाड, बाळकृष्ण लोखंडे, सावंत मॅडम यांच्यासह छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमधील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.























