पंढरपूर – वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना सक्तीने स्मार्ट वीज मीटर बसविले जात असल्याचा आरोप करत शिवक्रांती संघटनेच्या वतीने बुधवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर अर्धनग्न भव्य मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना वाढीव वीजबिले येत असल्याचा दावा करत ही सक्ती तात्काळ थांबवावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्मार्ट मीटर बसविणे सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, त्यानंतरही पंढरपूर शहरातील अनेक ग्राहकांच्या घरी सक्तीने स्मार्ट वीज मीटर बसविले जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त वीजबिले आल्याचा दावा करण्यात येत असून त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक फटका बसत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर अर्धनग्र मोर्चा काढण्यात आला. मोचानं कार्यालयासमोर तिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ग्राहकांना सक्तीने स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात पंढरपूर शहरातील अनेक नागरिक सहभागी झाले होते.
Post Views: 16