Sunday, September 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पैनगंगेच्या तीरावरील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता…

तरुण भारतbyतरुण भारत
February 5, 2026
in marathwada
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माहूर – तालुक्यातील टाकळी गावच्या चोलेवाडी येथे लगतच्या पैनगंगेच्या तीरावरती गेल्या बारा वर्षापासून सतत सुरू असलेल्या हरीनाम सप्ताहाची सांगता
कलियुगामाजी करावें कीर्तन ।
तेणें नारायण देईल भेटी ॥
या सद्भावनेने ह. भ. प. शिवा महाराज यांच्या कल्याच्या कीर्तनाने करण्यात आली.

हरी नामाचा गजर हरिनामाचा काठी डाव मांडिला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ अशा विठूरायाच्या गजरात चोले वाडी टाकळी गावात हनुमान मंदिरा पासून दिंडी काडून हरीनाम सप्ताह सोहळ्यानिमित्ताने हरिनामाचा गजर करण्यात आला गावात घरो घरी रांगोळी सडा टाकून दिंडीचे स्वागत केले सात दिवसात सुरु असलेल्या पारायण, भागवत, हरिपाठ, भारूड, महाप्रसाद आणि रात्रीला कीर्तनाचा कार्यक्रम तसेच धार्मिक कार्यक्रमांमुळे पैंणगंगे काठावर जणू पंढरपुरासारखे वातावरण पाहायला मिळाले.या सोहळ्यात अनेक दानशूर व्यक्तीं यांच्या कडून महाप्रसाद देऊन विशेष सहकार्य केले तसेच या कीर्तन सोहळ्यात पारायण ह. भ. प.विलास महाराज टाकळीकर आणि भागवत ह. भ. प. शिवा बापू महाराज यांच्या मधुर वाणीतून भागवत कथा पार पडली. या अखंड हरिनाम सप्ताह विशेष म्हणजे चिमुकल्याने हरिपाठ करून उपस्थिताची मनं जिंकली.
यावेळी कीर्तन सोहळ्यात उपदेश करताना भावी पिढीतला माणूस घडवण्यासाठी अशा सोहळ्याचे आयोजन करणे काळाची गरज असल्याची भावना ह. भ.प. निवृत्ती महाराज चाटे यांनी आपल्या कीर्तनातून व्यक्त केली.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्‍या अर्थाने संत परंपरेच अनुष्ठान लाभलं आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खर्‍या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सावता माळी, संत सोपानदेव यांच्यासोबतच अनेक संतांनी आपल्या अभंगातून, निरुपणातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याच काम केलं.
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारीलें देवालया॥
नामा तयाचा किंकर । त्यानें केला हा विस्तार ॥
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत॥
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश॥
संत बहिणाबाई आपल्या या अभंगात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ कशा पद्धतीने रोवली गेली याची माहिती देतात. बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी या भूमीत वारकरी संप्रदायाचा पाया रचला. आणि तुकोबारायांनी त्यावर कळस चढवायच काम केलं.
नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग। जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग॥
पहिले कीर्तनकार म्हणून संत नामदेव महाराज यांनी या परंपरेला सुरुवात केली. यावेळी ज्ञानोबाराय टाळकरी म्हणून तर गोरोबा काका पखवाज वाजवून नामदेवरायांना साथ द्यायचे. यावेळी चंद्रभागेच्या वाळवंटात ही कीर्तनं पार पडायची. इथूनच खर्‍या अर्थाने वारकरी कीर्तन परंपरेला प्रारंभ झाला आणि ही परंपरा आजतागायत सुरू आहे.
कालांतराने सात दिवसाचे पारायण सामूहिकरित्या सर्वांनी एकत्र येऊन पार पडू लागले. यातूनच सात दिवसाचा ‘अखंड हरिनाम सप्ताह’ खर्‍या अर्थाने सुरू झाला. सप्ताह म्हणजे वारकरी संप्रदायाची उपासना आहे. या सात दिवसात संतांचे अखंड नामचिंतन करण्यात येते.
अवघे होती लाभ एका या चिंतने ।
नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥

पहाटे काकडा आरती. त्यानंतर ज्ञानेश्वरी किंवा गाथ्याचे सामुदायिक पारायण. दुपारी प्रवचन. संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री हरिजागरण म्हणजेच कीर्तन, असा साधारण हरिनाम सप्ताहाचा दिनक्रम.
महाराष्ट्रात शेकडो वर्षांची परंपरा असलेले अखंड हरिनाम सप्ताह आजतागायत चालू आहेत. हिच परंपरा माहूर तालुक्यातील टाकळी गावच्या चोलेवाडी येथे गेल्या बारा वर्षांपासून सतत लगतच्या पैनगंगेच्या तीरावरती अखंडपणे सुरू आहे.

याठिकाणी सुरू असलेल्या सप्ताहात आघाताप्रमाणे पहिल्या दिवसाचे कीर्तन हे नामपर म्हणजे नाम महात्म्य सांगून देवाच्या स्वरुपाच वर्णन करणारं. दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी संत महात्म्य म्हणजेच संतांच चरित्र सांगितलं गेलं. चौथ्या आणि पाचव्या दिवशी भक्तीपर. सहाव्या दिवशी वेदांताचे अभंग यावर तर सातव्या दिवसाचे मागणीपर आणि आठव्या म्हणजेच शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन केले गेले.

टाकळीच्या चोलेवाडी येथील पैनगंगेच्या तीरावरती आयोजित हरिनाम सप्ताहात गावातील सर्वच ग्रामस्थ, विविध संस्थांच्या वतीने सप्ताहाचा नियोजन करण्यात आले. आजूबाजूच्या गावातील लोकांना देखील यावेळी सप्ताहाच आमंत्रण दिलं गेलं. यातून गाव परिसरातील सर्व टाळकरी, माळकरी, भाविक, भजनी मंडळ यांनी एकत्र येऊन हा सप्ताह साजरा केला.रोजच्या कीर्तनाला टाळकरी, पखवाज वादक, पेटी वादक, गायक, विनाधारी असे सर्वजण पांढर्‍या शुभ्र कपड्यात हजर होते. डोक्यावर टोपी, खांद्यावर उपरणे, गळ्यात टाळ, कपाळावर बुक्का असा एकंदरीत पेहराव होता.
विनाधारी महाराजांकडे विना देण्यात आली आणि एकमेकांच्या पाया पडत ‘राम कृष्ण हरी’ भजनाने रात्रीच्या कीर्तनाला सुरुवात केली गेली.यावेळी

रुप पाहतां लोचनीं ।
सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥
बहुतां सुकृतांची जोडी ।
म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगर ।
बाप रखुमादेवीवरू ॥
हा अभंग झाल्यावर विठोबा रखुमाई भजन सुरुवात तर शेवटी ‘जय विठ्ठल जय हरी विठ्ठल’ भजन होऊन कीर्तनाची सांगता होत होती.

अशा पद्धतीने सात दिवसाच्या सप्ताहात विविध महाराजांची कीर्तन झालीत. सप्ताहाचा शेवट काल्याच्या कीर्तनाने झाला. श्रीकृष्णाच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांची माहिती यावेळी सांगितली गेली. यावेळी साधारण शेवटच्याच दिवसाचे कीर्तनकारांनी मुक्कामी थांबून दुसर्‍या दिवशी सकाळी काल्याचे कीर्तन केले. हे कीर्तन सकाळी साधारण दहाला सुरू झाले.

या कीर्तनात कृष्णाच्या विविध लीला सांगणार्‍या गौळणी म्हटल्या गेल्या. शेवटी दह्याच्या प्रसादाचं मडकं फोडून काला साजरा केला गेला. दुपारी सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसाद दिला गेला. यावेळी सप्ताहासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं अशा मंडळींचे आयोजकांच्या वतीने आभार मानून सप्ताहाची सांगता करण्यात आली.

Post Views: 68
Previous Post

नांदेड ते निजामबाद दरम्यान पुष पुल रेल्वे सेवा सुरू करा – मराठी पत्रकार संघाची मागणी

Next Post

मारोती मानेमोड स्व. सतीश दराडे राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी ठरले

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मारोती मानेमोड स्व. सतीश दराडे राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी ठरले

ताज्या बातम्या

स्मशानभूमीत तृतीयपंथीयाचा मृत्यू

September 20, 2026

युवाशक्ती तरुण मंडळातर्फे रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर

September 20, 2026

शिवसेना म्हणते दुष्काळ जाहीर करा

September 20, 2026

विजय कुंदन जाधव यांचे अपघातात निधन

September 20, 2026

मुरारजीपेठेत फटाले कुटुंबीयांनी साकारला हलता देखावा

September 20, 2026

सोलापूर शहरातील परिचित युवा समाजसेवक विजय कुंदन जाधव यांचे दुर्दैवी अपघातात निधन #viral #solapurnews

September 20, 2026
५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1238998

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!