शासकीय कार्यालयातील काम आणि 6 महिने थांब याची प्रचिती सर्वसामान्य नागरिकाला नेहमीच येत असते. तहसील कामासाठी आलेल्या नागरिकांना मात्र हाच त्रास कमी करण्यासाठी मंगळवेढ्याच्या तहसीलदारांनी कार्यालयीन कामकाजासाठी दररोज नवनवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करून या प्रक्रियेला आळा घालण्याचा प्रयत्न केला.
नागरिकांची वर्दळ ही तहसील, पंचायत समिती, भूमी अभिलेख, कृषी, या कार्यालयात असल्याने त्याठिकाणी अनेकांना वेगळाच अनुभव येतो. त्याप्रमाणे तहसील कार्यालयात दररोज आलेल्या नागरिकांची कामे ही रेकॉर्ड रूम मधील जुने अभिलेख शोधणे व विविध शासकीय कामासाठी व खाजगी कामासाठी आवश्यक असणाऱ्या प्रतिज्ञापत्रावर सही घेण्यासाठीची वर्दळ नेहमी असते.