लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या वार्षिक फेरनिरीक्षणात निवडणूक आयोगाने मतदार यादीतून 1.66 कोटींहून अधिक नावे काढून टाकली आहेत. तसेच देशभरात 2.68 कोटीहून अधिक नवीन मतादार जोडले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत एकूण पात्र मतदारांची संख्या सुमारे 97 कोटी आहे. निवडणूक निरीक्षकांनी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली.
निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात वकील अमित शर्मा म्हणाले ती, “1 जानेवारी 2024 च्या संदर्भात मतदार यादीचे विशेष सारांश पुनरिक्षण (एसएसआर), पात्रता तारीख 8 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्ण होत आहे. एसएसआरच्या या कालावधीत आजपर्यंत एकूण 2,68,86,109 नवीन मतदारांची मतदार यादीत नावनोंदणी करण्यात आली आहे आणि मृत, डुप्लिकेट आणि कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या कारणास्तव 1,66,61,413 विद्यमान नोंदी हटवण्यात आल्या आहेत.देशातील आसाम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा ही सहा राज्ये वगळता संपूर्ण देशात या यादीत सुधारणा करण्यात आली. मतदार यादीतील डुप्लिकेट नावे शोधून काढण्याची मागणी करणाऱ्या संविधान वाचवा ट्रस्टने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर (पीआयएल) सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयात 2 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने शपथपत्राद्वारे ही आकडेवारी शेअर केली होती. सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सोमवारी आयोगाला मृत मतदार, कायमचे स्थलांतरित झालेले आणि डुप्लिकेशनमुळे हटवलेले मतदार दर्शवणारा आकडा सादर करण्यास सांगितले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे.