Wednesday, May 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अवकाळी पावसाचं थैमान, केळी, मिरची, डाळिंब, ऊस, कांदा पिकांचं नुकसान; 12 जनावरांचा मृत्यू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 14, 2024
in maharashtra
0
अवकाळी पावसाचं थैमान, केळी, मिरची, डाळिंब, ऊस, कांदा पिकांचं नुकसान; 12 जनावरांचा मृत्यू
0
SHARES
154
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यावर सध्या अवकाळी पावसाचं संकट आहे. सोमवारी ठाणे, मुंबईसह राज्यात अनेक भागात अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर राज्यात काही भागात मागील सलग दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु असल्याचं चित्र आहे. यामुळे शेतीपिकांसह, बागायतदारांचंही मोठं नुकसान झालं आहे. केळी, मिरची, डाळिंब, ऊस, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काही ठिकाणी जनावरांचाही मृत्यू झाला आहे.

तीन एकर केळीची बाग भूईसुपाट
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावातील शेतकरी राजेंद्र मारूती घाडगे यांची अवकाळी पावसाने तीन एकर केळीची बाग भूईसुपाट झाली. तीन एकरांमधे त्यांनी एकूण तीन हजार पाचशे केळीची झाडे लावली होती. या झाडांना सध्या केळीचे घडही लागले होते. मात्र अचानक आलेल्या पावसाने हे सगळं जमीनदोस्त झालंय. या अवकाळी पावसाने त्यांचं 13 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने केळी, ऊस, डाळिंब, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केलेले नाहीत. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

दहा एकर केळीची बाग जमीनदोस्त
सांगवी आष्टी गावातील येथील वादळी वाऱ्याने दहा एकर केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे. अधिकारी शेतकऱ्यांना उडवा-उडवीची उत्तर देतात. आष्टी तालुक्यातील सांगवी आष्टी येथील शेतकरी रमेश गायकवाड, किसान गायकवाड, नानासाहेब खेडकर, दत्तात्रय खेडेकर,सोमीनाथ खेडकर, सौरभ खेडकर, मधूकर खेडकर या शेतकऱ्यांच्या केळीची बाग वादळी वाऱ्यासह उद्ध्वस्त झाली, यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अधिकारी गावात येऊन पंचनामे न करता शेतकऱ्यांना उडवा-उडवीचे उत्तर देतात, यामुळे शेतकरी हाताश झाले आहेत. निसर्गही कोपला, अधिकरी चांगली वागणूक देत नाहीत, तर न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.

अवकाळी पावसानं लाखो रुपयांची मिरची सडली
भंडारा जिल्ह्यात धान पीक हे मुख्य उत्पादन असलं तरी आता नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी बागायती शेतीच्या माध्यमातून मिरचीचं उत्पादन घेऊ लागले आहेत. मागील आठवड्यात भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं अक्षरश: झोडपून काढलं. या अवकाळी पावसामुळं भात पीक जमीनदोस्त झालं. तर, पालेभाज्यांच्या शेतीलाही मोठा फटका बसला. तर मिरची पिकांनाही नुकसान झाल्याचं चित्र भंडारा जिल्ह्यात बघायला मिळालं. ज्या मिरची उत्पादकांनी मिरचीचं उत्पादन घेतलं किंवा त्या मिरची विक्रीतून ज्या व्यापाऱ्यांनी व्यवसाय करण्याकरिता मिरची खरेदी केली, अशांना या अवकाळी पावसाचा जबर फटका बसला. किंबहुना पावसामुळं मिरची सडली आणि आता या मिरचीला मार्केटमध्ये दर ही मिळणार नाही, अशी भीती आता व्यक्त होत आहे. छोटे व्यापारी किंवा शेतकऱ्याचा विचार केल्यास या अवकाळी पावसामुळं त्यांना पाच ते दहा लाख रुपयांचा फटका बसल्याचं बघायला मिळत आहे.

जोरदार पावसामुळे ऐन उन्हाळ्यात बेनीतुरा नदी प्रवाहीत, 12 जनावरांचा मृत्यू
मागच्या दोन दिवसांत धाराशिव जिल्ह्याच्या काही ग्रामीण भागाला अवकाळी पाऊस, वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटाचा जोरदार फटका बसला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात उमरगा तालुक्यातील बेनीतुरा नदीला पुराचे स्वरूप आले. अवकाळी पावसामुळे ऐन उन्हाळ्यात बेनीतुरा नदी प्रवाहित झाल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. धाराशिव, उमरगा, लोहारा तसेच कळंब तालुक्यातील गावांतील उन्हाळी पिकांचे, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. 10 गावांना विजांचा फटका बसला आहे. याचा मोठा तडाखा पशुपालकांना बसला असून पावसाच्या थैमानात 12 जनावरांचा बळी गेला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्याकडून होत आहे.

भंडाऱ्यातही अवकाळी पावसाची हजेरी
हवामान विभागानं 15 मेपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मध्यरात्री पुन्हा एकदा भंडाऱ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसांपासून उन्हाची प्रखरता जाणवू लागली असता, सोमवारी अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची होणाऱ्या उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसानं भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असून त्याच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.

Post Views: 60
Previous Post

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता येणार – खा. तेजस्वी सूर्या

Next Post

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे EPFO खातेधारकांचे टेन्शन मिटले, आता अवघ्या चार दिवसांत क्लेम सेटलमेंट!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे EPFO खातेधारकांचे टेन्शन मिटले, आता अवघ्या चार दिवसांत क्लेम सेटलमेंट!

सरकारच्या 'या' निर्णयामुळे EPFO खातेधारकांचे टेन्शन मिटले, आता अवघ्या चार दिवसांत क्लेम सेटलमेंट!

ताज्या बातम्या

*warning demolishing scene* पाच्छापेठेत बोगस बांधकाम पाडायला सुरुवात

May 19, 2026

दहावी बारावीच्या रिपिटर्सना लागणार अधिक शुल्क #marathinews

May 19, 2026

हसणाऱ्या कुटुंबाचा क्षणात अपघात दोन आजी आणि नातवाचा जागीच मृत्यू #solapurnews #viral

May 19, 2026

सिद्धेश्वर तलावात बुडून  वृद्धाचा मृत्यू

May 19, 2026

प्रदीप मयेकर यांची पेट्रोलियम गॅस वर्कस फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी सलग सहाव्यांदा निवड

May 19, 2026

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी देशव्यापी बंद

May 19, 2026

निखिल मस्के यांना ‘संत गाडगेबाबा युवा प्रबोधन पुरस्कार’ प्रदान

May 19, 2026

आईच्या स्मृतीस वृक्षरूपाने जिवंत ठेवण्याचा प्रेरणादायी उपक्रम

May 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0871696

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697