Tuesday, September 16, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लोकसभेत 400 पार असताना काँग्रेसचा भ्रष्टाचारी आणि मनमानी कारभार – डॉ. श्रीकांत शिंदे

new delhi shrikant shinde regional news

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 2, 2024
in top news
0
लोकसभेत 400 पार असताना काँग्रेसचा भ्रष्टाचारी आणि मनमानी कारभार – डॉ. श्रीकांत शिंदे
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली, २ जुलै, (हिं. स) काँग्रेसचे जेव्हा 400 खासदार होते तेव्हा केंद्र सरकारमध्ये केलेल्या भ्रष्ट आणि मनमानी कारभारावर शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत सडकून टीका केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर शिवसेना पक्षाकडून खासदार डॉ. शिंदे यांनी अभिनंदन केले. त्यावेळी केलेल्या भाषणात डॉ. शिंदे यांनी काँग्रेसचा दुटप्पीपणाचा बुरखा फाडला.

ते म्हणाले की जेव्हा काँग्रेसचे संख्याबळ 400 वर होते तेव्हा केंद्र सरकारने 1984 मध्ये शाहबानो या गरिब मुस्लिम महिलेला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अधिकार रद्द केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक रद्द करुन मुस्लिम महिलांना न्याय दिला. या देशात राष्ट्रपती यांना अपमानित करण्याचे काम काँग्रसने केले. बोफोर्स घोटाळा करुन लष्कराला कमजोर करण्याचे काम याच काँग्रेसने केले. भोपाळ गॅस दुर्घटनेतील आरोपी वॉरेन अॅंडरसन याला चार्टर्ड विमानाने देशाबाहेर पलायन करण्यास काँग्रेसने मदत केली अशी घणाघाती टीका डॉ. शिंदे यांनी केली.

डॉ. शिंदे म्हणाले की, काँग्रेसने आजपर्यंत संविधानावर फेक नॅरेटिव्हने राजकारण केले. संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोनवेळा निवडणुकीत पराभूत करण्याचे काम नेहरु यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने केले, अशी टीका डॉ. शिंदे यांनी केली. ते म्हणाले की, आमच्या सरकारने संविधान दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घराचे स्मारक आणि मुंबईतील इंदू मिलमधील भवदिव्य आंतरराष्ट्रीय स्मारक उभारुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान वाढवला आहे. ते पुढे म्हणाले की, एम. एस गिल यांनी निवडणूक आयुक्त असताना बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी रद्द केला होता. त्याच एम. एस गिल यांना काँग्रेसने राज्यसभेवर पाठवले आणि पुढे त्यांना क्रीडा मंत्री केले होते, असे सांगत डॉ. शिंदे यांनी काँग्रेसचा खोटेपणा समोर आणला.

ते म्हणाले की शिवसेना एनडीएमधील सर्वात जुना मित्र पक्ष आहे. एलआयसीच्या बोधवाक्याप्रमाणे जिंदगी साथ भी जिंदगी के बाद भी अशी शिवसेना भाजप युती आहे. अर्थात बाळासाहेब असताना आणि बाळासाहेबांनंतर देखील शिवसेना भाजप युती अभेद्य असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. विजयाबद्दल डॉ. शिंदे यांनी महाराष्ट्र आणि कल्याणच्या जनतेला धन्यवाद दिले. एनडीए सरकारकडून येत्या पाच वर्षात चांगली धोरणे लागू केली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. शिंदे म्हणाले की या निवडणुकीत लोकांनी एक संदेश दिलाय तो म्हणजे काँग्रेस एकट्याने लढली किंवा इंडि आघाडी म्हणून लढली तरी काँग्रेसला विरोधी बाकांवरच बसायचे आहे. राहुल गांधींची जागा विरोधी पक्षात आहे, असा टोला डॉ. शिंदे यांनी लगावला. दहा वर्षात काँग्रेस केवळ 44 जागांवरुन 99 जागांपर्यंत वाढली. त्यांना 100 आकडा देखील गाठता आला नाही. ते पुढे म्हणाले की, आकडेवारीचा विचार केला तर काँग्रेसने निवडणुकीत 285 जागांवर निवडणूक लढवली आणि केवळ 99 जागा जिंकल्या. त्यांचा स्ट्राईक रेट केवळ 34% इतका आहे. त्यांच्या 51 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, अरुणाचल, जम्मू कश्मिर, मध्य प्रदेश, दिल्ली आणि त्रिपुरा या राज्यात काँग्रेसला खाते सुद्धा खोलता आले नाही. काँग्रेसने वेगवेगळ्या राज्यात 336 उमेदवार उभे केले होते त्यातील फक्त 15 जिंकून आले. हे प्रमाण 5% पेक्षा कमी आहे. मात्र काँग्रेसचे आकडे कमी असले तरी यावेळी अक्कल वाढली आहे, असे डॉ. शिंदे म्हणाले.

डॉ. शिंदे म्हणाले की, लोकशाही सगळ्यात मोठा उत्सव शांततेत पूर्ण झाला ही आम्हा सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. जगभरातील 80 देशांत निवडणुका होणार असून त्यातील 55 देशांत निवडणुका झाल्या आणि 37 देशांत सरकार बदलले मात्र भारतीयांनी एनडीए सरकारवर विश्वास दाखवला. 75 वर्षातील एक मजबूत देश म्हणून भारताने मागील 10 वर्षात प्रगती केली आहे. भारत कोणावरही अवलंबून नाही. काँग्रेसच्या परराष्ट्र धोरणामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा पोखरली होती. त्यामुळे 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे आपल्याला उत्तर नाही देता आले. मात्र आमच्या सरकारने अंतर्गत सुरक्षा मजबूत केली आहे. जी 20 देशांमधील शक्तीशाली देशांच्या प्रमुखांशी चर्चा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची ताकद वाढवली असे डॉ. शिंदे म्हणाले.

अग्निवीर योजनेवर टीका करणाऱ्या काँग्रसेला डॉ.श्रीकांत शिंदे यांनी खडे बोल सुनावले. ते म्हणाले की मुंबईत 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटावेळी काँग्रेसचे सरकार होते. तेव्हाचे गृहमंत्री कपडे बदलत होते. आमच्या पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्रे नव्हती. बुलेटप्रुफ जॅकेट नव्हती. त्यामुळे काँग्रेसला अंतर्गत सुरक्षेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. मात्र मागील 10 वर्षात देशातील कोणत्याही मोठ्या शहरात दहशतवादी हल्ला झाला नाही. भारतावर वाकड्या नजरेने बघण्याची शेजारीत देशांची हिंमत नाही,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरतात, असे ते म्हणाले.

मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघात शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्या विजयावर आक्षेप घेऊन वृत्तपत्राची खोटी बातमी ट्विट केल्याबद्दल विरोधी पक्षनेते माफी मागणार का असा सवाल डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला.

महाराष्ट्रात डबल इंजिन सरकारने दोन वर्षात समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू, बुलेट ट्रेन, मराठवाडा रेल कोच फॅक्ट्री यासारख्या बड्या प्रकल्पांना रेकॉर्ड वेळेत पूर्ण करण्याचे काम केंद्र सरकारच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने केले आहे. महाराष्ट्रात आर्थिक विकास पाहणी अहवालाने विरोधकांच्या थोबाडात मारली आहे. एफडीआयमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्राचा विकास दर 9.4% इतका आहे. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते आज संसदेत उपस्थित नाहीत कारण ते पळपुटे आहेत, अशी खरमरीत टीका डॉ. शिंदे यांनी उबाठा गटावर केली. हिंदू हिंसक है असे बोलणाऱ्या विरोधी पक्ष नेत्या राहुल गांधी यांनाही डॉ. शिंदे यांनी खडे बोल सुनावले. हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती तलवार घेतली होती. त्यांनी ते धाडस दाखवले नसते तर आज अटक ते कटक हिंदवी स्वराज्य आले नसते, असे त्यांनी सांगितले.

*एनडीएच्या 10 वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडला*

डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की 2014 पूर्व भारतात 7 एम्स आणि 390 मेडिकल कॉलेज होते. आज 16 नवीन एम्स आणि 315 नवीन मेडिकल कॉलेज सुरु झाले आहेत. जम्मू काश्मिमध्ये नवीन एम्सचे काम सुरु असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. 10 वर्षात भारत 11 क्रमांकावरुन 5 क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. स्टार्टअप्स 1 लाखांहून अधिक असून 2014 पूर्वी देशात केवळ 300 स्टार्टअप होते.

*पांडुरंगाच्या जयघोषाने डॉ. शिंदे यांनी केली भाषणाची सुरुवात*

संसदेतील पहिले भाषण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पांडुरंगाच्या जयघोषाने सुरु केले. ते म्हणाले की आज महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा आषाढी वारी सोहळा सुरु आहे. लाखो वारकरी पायी दिंडीतून चालत पंढरपूर जाऊन पांडुंरंगाचे दर्शन करतात. त्याच पांडुंरंगाच्या जयघोषाने भाषणाची सुरुवात करतो असे सांगत त्यांनी पुंडलीकवरदा हारी विठ्ठलचा गजर केला आणि इतर खासदारांनी या जयघोषाला साथ दिली.

Previous Post

मुंबई मतदारसंघ – अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी

Next Post

खाजगी सावकाराने पैशासाठी तगादा लावल्याने तरुणाची रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
खाजगी सावकाराने पैशासाठी तगादा लावल्याने तरुणाची रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या…

खाजगी सावकाराने पैशासाठी तगादा लावल्याने तरुणाची रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 25, 2025
ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

August 25, 2025
देशातल्या 6 राज्यांमधील पोटनिवडणूक जाहीर…

जिल्हा परिषद निवडणुकीत आरक्षण संदर्भात नवीन वळण

August 25, 2025
शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

August 25, 2025
अवैध रेतीमाफियांवर रामतीर्थ पोलिसांचे सर्जिकल स्ट्राईक;  गाडीसह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध रेतीमाफियांवर रामतीर्थ पोलिसांचे सर्जिकल स्ट्राईक;  गाडीसह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2025
ग्रामीण भागात बनविलेल्या गणेश मुर्तीला परराज्यात पसंती!

ग्रामीण भागात बनविलेल्या गणेश मुर्तीला परराज्यात पसंती!

August 25, 2025
सोलापूर : किट नाशक घेऊन इसमाची आत्महत्या

सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; तिरू नदीकाठी खळबळ!

August 25, 2025
केंद्रासमोर राज्याची भूमिका मांडण्यात राज्य सरकार अपयशी – खा. सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी : वारकरी संप्रदाय पाईक संघाची मागणी

August 25, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

by Rohit Hegade
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

by Rohit Hegade
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

by Rohit Hegade
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

by Rohit Hegade
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

by Rohit Hegade
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

by Rohit Hegade
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

by Rohit Hegade
July 19, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...

Load More

राजकीय

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

by Rohit Hegade
August 25, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील 25-30 वर्षे शहराच्या अपेक्षित लोकसंख्येला शुद्ध व सातत्यपूर्ण...

ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

by Rohit Hegade
August 25, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/भोकरदन :  सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामसेविकांनी संगनमत करून बोगस खोटा ठराव अंधारात लिहून जनतेची दिशाभूल करून फसवणूक केल्याने...

देशातल्या 6 राज्यांमधील पोटनिवडणूक जाहीर…

जिल्हा परिषद निवडणुकीत आरक्षण संदर्भात नवीन वळण

by Rohit Hegade
August 25, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/किनवट : जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लवकरच पार पडणार आहे. ही सोडत...

शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

by Rohit Hegade
August 25, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/नवीन नांदेड : महाराष्ट्र राज्य सह नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर दुर्दैवी दुःखाच्या घटना घडल्या यामध्ये जीवित व आर्थिकहानी...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group