Sunday, June 29, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लोकसभेत 400 पार असताना काँग्रेसचा भ्रष्टाचारी आणि मनमानी कारभार – डॉ. श्रीकांत शिंदे

new delhi shrikant shinde regional news

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 2, 2024
in top news
0
लोकसभेत 400 पार असताना काँग्रेसचा भ्रष्टाचारी आणि मनमानी कारभार – डॉ. श्रीकांत शिंदे
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली, २ जुलै, (हिं. स) काँग्रेसचे जेव्हा 400 खासदार होते तेव्हा केंद्र सरकारमध्ये केलेल्या भ्रष्ट आणि मनमानी कारभारावर शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत सडकून टीका केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर शिवसेना पक्षाकडून खासदार डॉ. शिंदे यांनी अभिनंदन केले. त्यावेळी केलेल्या भाषणात डॉ. शिंदे यांनी काँग्रेसचा दुटप्पीपणाचा बुरखा फाडला.

ते म्हणाले की जेव्हा काँग्रेसचे संख्याबळ 400 वर होते तेव्हा केंद्र सरकारने 1984 मध्ये शाहबानो या गरिब मुस्लिम महिलेला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अधिकार रद्द केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक रद्द करुन मुस्लिम महिलांना न्याय दिला. या देशात राष्ट्रपती यांना अपमानित करण्याचे काम काँग्रसने केले. बोफोर्स घोटाळा करुन लष्कराला कमजोर करण्याचे काम याच काँग्रेसने केले. भोपाळ गॅस दुर्घटनेतील आरोपी वॉरेन अॅंडरसन याला चार्टर्ड विमानाने देशाबाहेर पलायन करण्यास काँग्रेसने मदत केली अशी घणाघाती टीका डॉ. शिंदे यांनी केली.

डॉ. शिंदे म्हणाले की, काँग्रेसने आजपर्यंत संविधानावर फेक नॅरेटिव्हने राजकारण केले. संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोनवेळा निवडणुकीत पराभूत करण्याचे काम नेहरु यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने केले, अशी टीका डॉ. शिंदे यांनी केली. ते म्हणाले की, आमच्या सरकारने संविधान दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घराचे स्मारक आणि मुंबईतील इंदू मिलमधील भवदिव्य आंतरराष्ट्रीय स्मारक उभारुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान वाढवला आहे. ते पुढे म्हणाले की, एम. एस गिल यांनी निवडणूक आयुक्त असताना बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी रद्द केला होता. त्याच एम. एस गिल यांना काँग्रेसने राज्यसभेवर पाठवले आणि पुढे त्यांना क्रीडा मंत्री केले होते, असे सांगत डॉ. शिंदे यांनी काँग्रेसचा खोटेपणा समोर आणला.

ते म्हणाले की शिवसेना एनडीएमधील सर्वात जुना मित्र पक्ष आहे. एलआयसीच्या बोधवाक्याप्रमाणे जिंदगी साथ भी जिंदगी के बाद भी अशी शिवसेना भाजप युती आहे. अर्थात बाळासाहेब असताना आणि बाळासाहेबांनंतर देखील शिवसेना भाजप युती अभेद्य असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. विजयाबद्दल डॉ. शिंदे यांनी महाराष्ट्र आणि कल्याणच्या जनतेला धन्यवाद दिले. एनडीए सरकारकडून येत्या पाच वर्षात चांगली धोरणे लागू केली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. शिंदे म्हणाले की या निवडणुकीत लोकांनी एक संदेश दिलाय तो म्हणजे काँग्रेस एकट्याने लढली किंवा इंडि आघाडी म्हणून लढली तरी काँग्रेसला विरोधी बाकांवरच बसायचे आहे. राहुल गांधींची जागा विरोधी पक्षात आहे, असा टोला डॉ. शिंदे यांनी लगावला. दहा वर्षात काँग्रेस केवळ 44 जागांवरुन 99 जागांपर्यंत वाढली. त्यांना 100 आकडा देखील गाठता आला नाही. ते पुढे म्हणाले की, आकडेवारीचा विचार केला तर काँग्रेसने निवडणुकीत 285 जागांवर निवडणूक लढवली आणि केवळ 99 जागा जिंकल्या. त्यांचा स्ट्राईक रेट केवळ 34% इतका आहे. त्यांच्या 51 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, अरुणाचल, जम्मू कश्मिर, मध्य प्रदेश, दिल्ली आणि त्रिपुरा या राज्यात काँग्रेसला खाते सुद्धा खोलता आले नाही. काँग्रेसने वेगवेगळ्या राज्यात 336 उमेदवार उभे केले होते त्यातील फक्त 15 जिंकून आले. हे प्रमाण 5% पेक्षा कमी आहे. मात्र काँग्रेसचे आकडे कमी असले तरी यावेळी अक्कल वाढली आहे, असे डॉ. शिंदे म्हणाले.

डॉ. शिंदे म्हणाले की, लोकशाही सगळ्यात मोठा उत्सव शांततेत पूर्ण झाला ही आम्हा सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. जगभरातील 80 देशांत निवडणुका होणार असून त्यातील 55 देशांत निवडणुका झाल्या आणि 37 देशांत सरकार बदलले मात्र भारतीयांनी एनडीए सरकारवर विश्वास दाखवला. 75 वर्षातील एक मजबूत देश म्हणून भारताने मागील 10 वर्षात प्रगती केली आहे. भारत कोणावरही अवलंबून नाही. काँग्रेसच्या परराष्ट्र धोरणामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा पोखरली होती. त्यामुळे 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे आपल्याला उत्तर नाही देता आले. मात्र आमच्या सरकारने अंतर्गत सुरक्षा मजबूत केली आहे. जी 20 देशांमधील शक्तीशाली देशांच्या प्रमुखांशी चर्चा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची ताकद वाढवली असे डॉ. शिंदे म्हणाले.

अग्निवीर योजनेवर टीका करणाऱ्या काँग्रसेला डॉ.श्रीकांत शिंदे यांनी खडे बोल सुनावले. ते म्हणाले की मुंबईत 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटावेळी काँग्रेसचे सरकार होते. तेव्हाचे गृहमंत्री कपडे बदलत होते. आमच्या पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्रे नव्हती. बुलेटप्रुफ जॅकेट नव्हती. त्यामुळे काँग्रेसला अंतर्गत सुरक्षेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. मात्र मागील 10 वर्षात देशातील कोणत्याही मोठ्या शहरात दहशतवादी हल्ला झाला नाही. भारतावर वाकड्या नजरेने बघण्याची शेजारीत देशांची हिंमत नाही,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरतात, असे ते म्हणाले.

मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघात शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्या विजयावर आक्षेप घेऊन वृत्तपत्राची खोटी बातमी ट्विट केल्याबद्दल विरोधी पक्षनेते माफी मागणार का असा सवाल डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला.

महाराष्ट्रात डबल इंजिन सरकारने दोन वर्षात समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू, बुलेट ट्रेन, मराठवाडा रेल कोच फॅक्ट्री यासारख्या बड्या प्रकल्पांना रेकॉर्ड वेळेत पूर्ण करण्याचे काम केंद्र सरकारच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने केले आहे. महाराष्ट्रात आर्थिक विकास पाहणी अहवालाने विरोधकांच्या थोबाडात मारली आहे. एफडीआयमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्राचा विकास दर 9.4% इतका आहे. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते आज संसदेत उपस्थित नाहीत कारण ते पळपुटे आहेत, अशी खरमरीत टीका डॉ. शिंदे यांनी उबाठा गटावर केली. हिंदू हिंसक है असे बोलणाऱ्या विरोधी पक्ष नेत्या राहुल गांधी यांनाही डॉ. शिंदे यांनी खडे बोल सुनावले. हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती तलवार घेतली होती. त्यांनी ते धाडस दाखवले नसते तर आज अटक ते कटक हिंदवी स्वराज्य आले नसते, असे त्यांनी सांगितले.

*एनडीएच्या 10 वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडला*

डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की 2014 पूर्व भारतात 7 एम्स आणि 390 मेडिकल कॉलेज होते. आज 16 नवीन एम्स आणि 315 नवीन मेडिकल कॉलेज सुरु झाले आहेत. जम्मू काश्मिमध्ये नवीन एम्सचे काम सुरु असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. 10 वर्षात भारत 11 क्रमांकावरुन 5 क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. स्टार्टअप्स 1 लाखांहून अधिक असून 2014 पूर्वी देशात केवळ 300 स्टार्टअप होते.

*पांडुरंगाच्या जयघोषाने डॉ. शिंदे यांनी केली भाषणाची सुरुवात*

संसदेतील पहिले भाषण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पांडुरंगाच्या जयघोषाने सुरु केले. ते म्हणाले की आज महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा आषाढी वारी सोहळा सुरु आहे. लाखो वारकरी पायी दिंडीतून चालत पंढरपूर जाऊन पांडुंरंगाचे दर्शन करतात. त्याच पांडुंरंगाच्या जयघोषाने भाषणाची सुरुवात करतो असे सांगत त्यांनी पुंडलीकवरदा हारी विठ्ठलचा गजर केला आणि इतर खासदारांनी या जयघोषाला साथ दिली.

Previous Post

मुंबई मतदारसंघ – अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी

Next Post

खाजगी सावकाराने पैशासाठी तगादा लावल्याने तरुणाची रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
खाजगी सावकाराने पैशासाठी तगादा लावल्याने तरुणाची रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या…

खाजगी सावकाराने पैशासाठी तगादा लावल्याने तरुणाची रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

June 20, 2025
‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 1, 2025
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

March 22, 2025
मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

March 3, 2025
मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

March 3, 2025
वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

March 3, 2025
धुळे : घरफोडी करणा-या अट्टल चोराला धुळे तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले

पंकज नगरात घरफोडी; रोख ५ हजार रूपयांसह लाखोंचे दागिने चोरून नेले

March 3, 2025
लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसलेल्या महिलेनं एका पिग्मी एजंटला २५ हजार रुपयांना लुटलं….

रात्री दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्या मुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले

March 3, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2024
0

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 26, 2024
0

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 23, 2024
0

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 19, 2024
0

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 17, 2024
0

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

Load More

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2025
0

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 30, 2024
0

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...

बार्शी विधानसभा २४६ मधील सकाळी ७ ते ९ मध्ये झालेले मतदान.

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी सुभाष देशमुख 94 हजार754 अमर पाटील 36हजार 724हजार

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group