*सोयाबीन,कापसाचे अनुदान सर्वच शेतकऱ्यांना द्या-कलंबरकर*
ई-पिक पाहणी अँपवरील नोंदणीची अट रद्द करा.
मुक्रमाबाद – प्रतिनिधी
२०२३ मध्ये कापूस-सोयाबीन पिकाचे भाव खुप कमी होते.म्हणून सरकार कमी भावात विकलेल्या सोयाबीन-कापूस पिकासाठी हेक्टरी ५००० रु. अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.पण हे अनुदान देताना ई-पिक पाहणी अँप/पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच हे अनुदान देणार आहे.या अटीमुळे खुप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत.या अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनीसुद्धा सोयाबीन-कापूस बाजारामध्ये कमी भावानेच विकलेला आहे.तरीपण या शेतकऱ्यांना या अटीमुळे अनुदानाचा लाभ मिळणार नाही
.मग सरकारचा नेमका उद्देश काय? सोयाबीन-कापूस लागवड केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला या अनुदानाचा लाभ मिळाला पाहिजे.यासाठी ई-पिक पाहणी अँपवरील नोंदणीची अट रद्द करा अशी मागणी कृषीमंत्र्याकडे तहसीलदार राजेश जाधव यांच्यामार्फत स्वाभिमानीचे शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी दिनांक 31जुलै रोजी केली आहे.
सोयाबीन-कापूस लागवड केलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांला हे अनुदान मिळाले तरच योजनेचा उद्देश साध्य होणार आहे.
दरवेळी सरकार शेतकऱ्यांसाठी योजना आणत असताना अटी लावून जास्तीच्या शेतकऱ्यांना योजनेपासून वगळत आहे.हा शेतकऱ्यांवर खुप मोठा अन्याय आहे.म्हणून सरकारने खरीप २०२३ मधील सोयाबीन-कापूस अनुदान देण्यासाठी लावलेली ई-पिक पाहणी अँपवरील नोंदणीची अट तात्काळ रद्द करावी आणि सोयाबीन-कापूस लागवड केलेल्या सरसकट शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ द्यावा.अन्यथा सरकारला याची किंमत मोजावी लागणार आहे,असा इशारा निवेदनात दिला आहे.यावेळी हणमंतमामा वाडीकर,धोंडीराम पाटील,रियाजभाई शेख आदी उपस्थित होते.