भोकरदन : भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालया मध्ये ता. 8 गुरुवार रोजी रुग्ण कल्याण समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील आले असता त्यांना ग्रामीण रुग्णालयातील सुविधा पुरवण्यासाठी दीपक मोरे यांनीं ग्रामीण रुग्णालयातील विविध विषयावर चर्चा करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात म्हटले आहे की येथील ग्रामीण रुग्णालया मध्ये येणाऱ्या रुग्णांना कशा कशाप्रकारे सेवा देता येईल याचा रुग्ण कल्याण समितीने आढावा घेतला व ग्रामिण रुग्णालय काही समस्या तात्काळ सोडविणे यासाठी कसा मार्ग काढण्यात येईल व रुग्णांना कशा प्रकारे सेवा देता येईल याची या बैठकीत चर्चा करण्यात आली, रुग्णालयात रुग्णांसाठी व नागरीकांसाठी असलेल्या शासकिय सुविधा वेळेवर मिळत नसल्यामुळे रुग्णांचे व नागरीकांचे मोठे हाल होत आहे,
त्यामुळे खालील दर्शविलेल्या सुविधा तात्काळ सुरु करुन रुग्णांची व नागरीकांची होणारी हेळसांड तात्काळ थांबविण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे, ग्रामिण रुग्णालय भोकरदन येथे जालना जिल्हयातील सर्व रुग्णालयाच्या तुलनेत ओपीडी ची संख्या जास्त असल्यामुळे दवाखान्यास पुरविण्यात येणारा औषधी साठा देखील कमी पडत असल्यामुळे तो वाढवुन देण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे . रुग्णालयात असलेले कर्मचारी हे रुग्णालयात उशिरा येतात व सुट्टी होण्याच्या अगोदरच निघुन जातात,तसेच बरेच कर्मचारी हे रुग्णालयात गैरहजर असतात व आपण हजर असल्याचे दाखवुन पगार उचलतात असे देखील या निवेदनात नमूद केले आहे,
त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रीक अनिवार्य करण्यात यावे व ग्रामिण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने E.C.G काढण्यासाठी तज्ञ स्टॉप नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे,त्यामुळे तज्ञ E.C.G. टेक्नीशियनची नेमणुक करण्यात यावी,ग्रामिण रुग्णालयात मंजुर करण्यात आलेले 108 रुग्णवाहीका ही नेहमीच नादुरुस्त असल्याने सिरियस पेन्शनटची हेळसांड होत आहे, तसेच रुग्णवाहीकेमध्ये पेन्शट सोबत राहणारे डॉक्टर हे रुग्णवाहीकेत समोर न बसता पेन्शनजवळ मागे बसण्यास त्यांना आदेशीत करावे व रुग्णासोबत कोणत्याही प्रकारची अरेरावीची भाषा वापरणार नाही त्यांना देखील समज द्यावी
तसेच भोकरदन तालुक्यातील रुग्णांसाठी अपंगासाठी महिण्यातुन एकदा ग्रामिण रुग्णालय भोकरदन येथे मेळावा घेण्यात येवुन अपंगांना जागेवर प्रमाणपत्र देण्यात यावे ग्रामिण रुग्णालयाकडे असलेले विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे ऑपलाईन न देता ऑनलाईन पध्दतीने देण्यात यावे. ग्रामिण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने रुग्णांना उपचार देण्यासाठी रुग्णालयातील स्टॉप कमी पडत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे त्यामुळे पुरेसा स्टॉप वाढवून देण्यात यावा. वरील दर्शविलेले सर्व मुद्ये तात्काळ मंजुर करुन त्याची अमलबजावणी करण्यात यावी अशे या निवेदनात म्हटले आहे नसता लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक मोरे यांनी दिला आहे
यावेळी शेख हमद,बबन जैवाळ हे उपस्थित होते