तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : आधार कार्ड अपडेट न झाल्यामुळे शिक्षकांनाच ‘फेल’ करण्याची अफलातून संचमान्यता शालेय शिक्षण विभागाने आणली आहे. त्यामुळे ज्यांचे या विषयाशी घेणे-देणे नाही, अशा शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आले आहेत. मुलाचे आधार कार्ड असले पाहिजे, त्याची निश्चिती झाली तरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित केली जाईल, असा निकष संचमान्यतेत आहे. मात्र कुठे मुलांचे ठसे जुळत नाहीत, कुठे नावाचे स्पेलिंग चुकलेले असते, तर कुठे जन्मतारीख जुळत नाही. त्यामुळे ‘आधार’ असूनही अशी मुले शिक्षण विभागाच्या लेखी ‘निराधार’ होतात.
इकडे विद्यार्थी वर्गात असूनही सरकार मात्र ‘देता आधार, का करू अंधार’, असा इशारा शिक्षकांना देत आहे.
शिक्षकांनी मात्र या कामामध्ये अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले. त्याची सरकारने दखल घेण्याची मागणी केली आहे. जन्मदाखला मध्ये चूक झाली असेल तर त्याप्रमाणे आधार कार्ड नोंदणी होते जन्मदाखला शाळेत दुरुस्ती करता येत नाही.यामुळे संचमान्यतेत विद्यार्थी व्हॅलीड होत नसल्याने शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे.
राज्यात आधार कार्ड अपडेट केल्यावरच विद्यार्थ्यांची पटसंख्या समजते. त्यानुसार शाळेच्या पटसंख्यानुसार त्या शाळेमध्ये किती शिक्षकांची आवश्यकता असले पाहिजे त्यामुळे पटसंख्यानुसार शिक्षकांच्या जागा वाढवले किंवा कमी केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जन्मतारीख,बोटाचे ठसे किंवा फोटो चुकीच्या पद्धतीने अपलोड होता कामा नये ते दुरुस्ती करण्याचे काम संबंधित शैक्षणिक विभागाला देण्यात आली आहे. दुरुस्ती झाल्यावरच संचमान्यता दुरुस्ती होत असते.
१५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेनुसार विद्यार्थी संख्येपेक्षा एकही विद्यार्थी कमी असला, तरी तेथे एकही शिक्षक दिला जात नाही. तेथे विद्यार्थी असूनही संचमान्यतेमध्ये शून्य शिक्षक दिले जातात. त्यामुळे शिक्षकांवर गंडांतर येते .परिणामी शिक्षक मंजूर होण्यात अडचण निर्माण होते.
जिल्ह्यात विद्यार्थी आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक
शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका ६, ८२, ५८९ पैकी १५ हजार ६६१ विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणीच नाही.
२४ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची आधार नोंदणी रखडली. आधार नोंदणी पात्रता रखडली असल्याने सोलापूर जिल्ह्याचे काम फक्त ९२ टक्के
आहे.
सर्वाधिक आधार नोंदणी पंढरपूर येथे जिल्ह्यातील ४६९८ शाळापैकी ६,८२, ५७९ विद्याथ्यर्थ्यांपैकी १५,६६१ विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अद्याप झालीच नाही. तर, २४ हजार ६८ विद्यार्थ्यांचे आधार अपडेटेशन प्रलंबित आहे. आधार नोंदणीचे सर्वात कमी काम उत्तर सोलापूर ९०८१ व शहर दोन ९०.२८ टक्के झाले आहे. आधार अपडेटेशन नसणारे सर्वाधिक ३१७७ विद्यार्थी शहर दोन भागामध्ये आहे. सर्वाधिक आधार नोंदणीचे काम पंढरपूर ९४.६६ टक्के झाले आहे. त्यानंतर माळशिरस ९४.४१ टक्के झाले आहे.
प्रत्येक शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये विद्यार्थी संख्या एका शिक्षकां मागे ३० पट असताना अनेक शाळांमध्ये विद्यार्थींची संख्या जास्त आहे.तरी शिर गणना केल्यास किंवा त्यांच्या शाळेची दाखला पाहिल्यास पट जास्त मात्र आधार चुकीमुळे त्यांची सरल पोर्टलवर नांव नसल्यामुळे कमी याचा परिणाम संचमान्यतेवर होतो व शिक्षक अतिरिक्त ठरेल याचे शासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे.
राज्यातील असंख्य शाळेमध्ये आधार कार्ड बाबतीत अडचणी निर्माण होत आहेत.जर आधार कार्ड अपडेट झाले नाही तर त्यांची नोंद प्रणालीवर होत नाही. त्यामुळे विद्यार्थांचा इयत्ता व पटसंख्या कळत नाही. तसेच दहावी, बारावी व शिष्यवृत्ती परीक्षा वेळीसुद्धा अडचण निर्माण होईल तसेच पटसंख्या कमी दिसल्यास याचा परिणाम शाळेच्या अनुदानावर तसेच सेवक संचवर होतो. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठेवण्याची शक्यता आहे. शिक्षकाची भविष्यांची शासनाने गांभीर्याने विचार करावा.
Post Views: 31