सोलापूर – पंढरपूर येथे आषाढी वारीच्या कालावधीत लाखो वारकऱ्यांची गर्दी होत असताना त्यांची सुरक्षा, हरवलेले व्यक्ती शोधणे तसेच गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून फेस रिकग्निशन आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला होता. या उपक्रमाबद्दल विधानपरिषद आ. डॉ. मनीषा कायंदे यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीण व इतर अधिकारी तसेच पोलिसांचे कौतुक केले.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पंढरपूर वारीदरम्यान अत्याधुनिक फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे २० लाख वारकऱ्यांचे फेस रिकग्निशन करण्यात आले. या उपक्रमामुळे वारकरी सुरक्षेला मोठी मदत झाली असून हरवलेले व्यक्ती शोधणे, संशयित व्यक्तींची ओळख पटविणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे यामध्ये पोलीसांना मोठ्य प्रमाणात सहाय्य मिळाले. नागरिकांची सुरक्षा अधिक मजबूत होते. भविष्यात देखील अशा उपक्रमांद्वारे पोलिसिंग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून केला जाणार आहे असे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बोलताना सांगितले.
हा उपक्रम राज्यातील मोठ्या धार्मिक ठिकाणी प्रथम वापरण्यात आलेला एक नाविन्यपूर्ण प्रयोग ठरला असून त्याची दखल राज्यस्तरावर देखील घेण्यात आली आहे. या कामगिरीची चर्चा महाराष्ट्र विधानपरिषदे मध्ये देखील झाली असून या उपक्रमाबद्दल विधानपरिषद आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीण व इतर अधिकारी तसेच पोलिसांचे कौतुक केले.
यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सन २०२५ मध्ये एकुण २७ ते २८ लाख भाविक पंढरपुर येथे दर्शनाकरीता आले होते. त्यादिवशी २८६१ लॉक मिसिंग झाले होते त्यापैकी २८५२ लोंकांना त्यांचे नातेवाईका पर्यंत सुरंक्षितरित्या पोहचविण्यात आले.
सदर नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापुर ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, सर्व उपविभागीय अधिकारी, व पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीण तसेच सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच तांत्रिक पथकांनी परिश्रमपूर्वक काम करून हा उपक्रम यशस्वी केला.आहे.


























