अकलूज – सध्या बाजारात कांदा दर प्रति किलो १० रुपयेच्या आतपर्यंत घसरले आहेत हे आपन ऐकत आहे वाचत आहे.कांदा प्रामुख्याने खरीप,रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर पिकविला जातो.यावर्षी समाधानकारक पाऊस हवामान थंडीमुळे विक्रमी कांदा उत्पादन झाले आहे.प्रति एकर उत्पादन समाधानकारक आहे कांदा उत्पादन,बाजारपेठेतील मागणी व पुरवठा यावर कांदा पिकाचे दर अवलंबून व स्थिर होतात.कांदा हवेशीर शास्त्रीय तांत्रीक पद्धतीने साठवन केली तरच तो टिकतो.
सध्याच्या परिस्थितीत शेतकरी बांधवांकडे तांत्रिक आधूनिक शास्त्रीय कांदा साठवन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नुकसानाला सामोरे जावे लागते आहे.कांदा दराचा प्रश्न पांढरा कांदा पिकाला जास्त परिणाम करत नाही कारण पांढरा कांदा ८०% प्रक्रियासाठी वापरला जातो.लाल कांदाच्या दरातील चढ व उतार सर्वसामान्य व शेतकरी बंधू यांचे अंदाजपत्रकवर परिणाम करणारा घटक आहे. यावर उपाय म्हणजे राष्ट्रीय कृषि विकास योजना मधून महाडीबीटीवर शेतकरी बंधू व शेतकरी समुह यांनी समाजस्य करार सह कांदा चाळ उभारणीला अर्ज करावा.१० टनासाठी १ एकर १५ टनासाठी दीड ते दोन एकर व २५ टनासाठी १ हेक्टर कांदा लागवड व नोंदीचा ७ /१२,८ अ, आधार कार्ड,बॅक पासबुक झेरॉक्स व उभारणी करावयाचे कांदा चाळ क्षमताचे नुसार प्लॅन व सविस्तर अंदाजपत्रक अपलोड केलेस पूर्व संमतीनंतर ३ महिने कालावधीत विहीत आकारमानाची कांदाचाळ उभारणी केलेस प्रति टन ४०००रु अनुदान शेतकऱ्यांना अदा केले जाते.दर उतार घसरण वेळी कांदा प्रतवारी करून शास्त्रीय पद्धतीने साठवन करून दर वाढ झालेवर विक्री केलेस नक्कीच शेतकरी बांधवाना फायदा होईल.तरी कांदा उत्पादकांनी कांदा चाळ उभारणी साठी आधिक माहीती व मार्गदर्शनासाठी नजीकचे कृषी विभाग कार्यालय व कर्मचारी यांचेशी संपर्क करण्याचे अहवान मंडळ कृषि अधिकारी अकलूज कार्यालयाने केली आहे.
*चौकट*
अमेरिका-इराक युध्द सुरू असल्यामुळे आपल्या देशातून परदेशात कांदाची निर्यात बंद असल्यामुळे बाजारपेठेत कांदाचे दर पडले आहेत.त्यामुळे शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही आहे.साधारणता एक एकर कांदा पीक घ्यायला शेतक-याला सव्वा लाख खर्च येतो तर शेतकऱ्यांना एकरातील कांदाचे उत्पन्नाला चाळीस हजार मिळत आहे. पीकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेती व्यवसाय करणे जोखमीचे झाले आहे.
*बाळासाहेब इंगळे विजयवाडी*
कांदा उत्पादक शेतकरी

























