सोलापूर – २०२६-२०२७ या वर्षात भारत सरकारच्या वतीने जनगणना मोहीम सुरु आहे.यंदाच्या जनगणनेचे वैशिष्ठ असे आहे की प्रत्येकाला आपली माहिती भरण्यासाठी सरकारने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.जेणेकरून नागरिक आपली माहिती अचूक भरतील व शासनाचे काम ही सोपे होईल.
या राष्ट्रीय कार्यात वीरशैव सेवा संघाच्या वतीने विविध ठिकाणी मेळावे घेण्यात येत आहेत.या उपक्रमांतर्गत शंकरलिंग महिला मंडळ येथे शिबिर घेण्यात आले.यावेळी उपस्थितांना स्वयं जनगणना माहिती भरण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महिला मंडळाचे सौ.राजश्री थळंगे, सौ. लता धनशेट्टी, सौ.अंबिका बिज्जरगी,सौ. वनमाला बंटनुर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी वीरशैव सेवा संघाचे सचिव सिद्धारुढ निंबाळे यांनी या राष्ट्रीय कार्यात वीरशैव सेवा संघाचे आय टी क्षेत्रात निष्णात असलेले युवक मंडळी स्वखुशीने सहभागी होत आहेत.या युवकांकडून राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन समाजसेवा घडत आहे.त्यांचे हे कार्य अभिनंदनीय असल्याचे म्हटले.
या स्वयं जनगणना मोहिमेत वीरशैव सेवा संघाचे युवा पदाधिकारी रोहित बिद्री,आकाश शबादे ,सुरज आतनुरे संजयकुमार धनशेट्टी,राजकुमार धनशेट्टी,मल्लाप्पा मोटगी, सिद्धाराम कोनापुरे आदी परिश्रम घेत आहेत.तसेच ग्रुप मध्ये स्वयं जनगणेसाठी रोहित बिद्री (मो.नंबर. 9960552615)यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन वीरशैव सेवा संघाने केले आहे.


























