पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव परीसरात पावसाळा सुरु होऊन दोन महीने उलटुन गेले तरीही अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झालाच नाही .यामुळे या परीसरातील पिक पाणी सध्या चांगलेच अडचणीत आले आहे.सध्या या भागाला वरदायीनी ठरलेल्या विर,भाटघर, निरा देवधर ही धरणे सध्या शंभर टक्के भरली आहेत.यामुळे निरा उजव्या कॅनालला गेल्या पंधरा दिवसांपुर्वी पाणी सोडण्यात आले आहेत. ही धरणे शंभर टक्के भरली असुन या धरणातून ज्यादा झालेले पाणी निरा नदीला सोडले आहे.यामुळे निरा नदीला अक्षरश महापुर आला आहे .यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.तर पिलीव परीसरातील या कॅनालवरील असणाऱ्या फाटयांना अद्यापपर्यंत पाणीच सोडण्यात आले नाही .यामुळे या फाटयावरील अवलंबून असणारी निमगाव, मळोली, शेंडेचिच, झिंजेवस्ती, कुसमोड, साळमुख ,तांदुळवाडी या गावातील पिके ऐन उन्हाळ्यात पाण्यावाचून जळुन चालली आहेत.शासन उपलब्ध असणाऱ्या फाटयादवारे पिकांना पाणी देत नाही एवढी बिकट अवस्था या भागातील शेतकऱ्यांची ऐन पावसाळ्यातच झाली आहे.धरणे शंभर टक्के भरली आहेत नदीला पाणी सोडुन देण्यात आले आहे पण पिकांना पाणी प्रशासन देत नाही.उलट वाया जाणारे कींवा ज्यादा झालेल्या पाण्याने पावसाळ्यात या परिसरातील बंधारे, तलाव, तळी भरणे आवश्यक आहे .याचा फायदा शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीच्या पाण्यासाठी होणार आहे.यामुळे पाऊस नसल्यामुळे या पाण्याचा उपयोग होणार आहे.उलट पाणी नदीला सोडण्या ऐवजी या भागातील सर्व फाटयांना पाणी सोडले तर हाता तोंडाला आलेली पिके शेतकऱ्यांच्या हाती लागतील. एकीकडे प्रशासन धरणे भरल्यामुळे नदीला पाणी सोडुन महापुर आणीत नागरिकांचे जीवनमान धोक्यात घालत आहे तर दुसरीकडे पाणी न सोडल्यामुळे पिके जळुन चालली आहेत .तरी ही विदारक परिस्थिती प्रशासनाच्या लक्षात येत नाही ही दुर्दैवी बाब आहे. या भागातील शेतकऱ्यांची अवस्था पाणी उशाला कोरड घशाला अशी झाली आहे. प्रशासनाने ताबडतोब पिलीव परीसरातील सर्वच फाटयांना ताबडतोब पाणी सोडावे तसेच या कॅनालच्या पाण्याने या भागातील बंधारे, तलाव, तळी भरुन देण्याची मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे . चौकट _ निरा उजव्या कॅनालवरील सर्व फाटयांना पाणी सोडावे तसेच पिलीव येथील इंग्रजकालीन जॅकवेल ( इस्पीकची) ताबडतोब दुरुस्ती करुन ओढयाला पाणी सोडावे जेणेकरूनच याचा झिंजेवस्ती, कुसमोड, मळोली, शेंडेचिच या गावातील बंधारे, तलाव, तळी भरण्यासाठी उपयोग होईल. जेणेकरून यामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल _ चंद्रकांत जाधव,जि प सदस्य पिलीव जिल्ह्य परिषद गट. चौकट _ पिलीव भागातील निरा उजव्या कॅनालवरील सर्व फाटयांना पाणी सोडण्यासाठी तसेच या पाण्याने या भागातील बंधारे, तलाव, तळी भरुन दयावीत अशी मागणी माळशिरस 7तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्याकडे आपण मागणी करणार असल्याचे कुसमोडचे माजी सरपंच सिताराम धायगुडे यांनी सांगीतले . फोटो _ (1)निमगाव _ मळोलीकडे जाणारा मुख्य 65 फाट्याला पाणी सोडले नसल्याचे चित्र.(2) मुख्य कॅनालला सोडलेले पाणी .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















