सोलापूर – नसरापूर येथे चार वर्षाच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाचा प्रतिकात्मक चौरंगा करून संभाजी आरमारने आंदोलन केले. स्वराज्यात भगिनीवर वाईट नजर टाकणाऱ्या रांजाच्या पाटलाचे हात आणि पाय कलम करून शिवरायांनी त्या भगिनीला न्याय तर दिलाच सोबत स्वराज्यातील माता – भगिनींना सुरक्षेची हमी देखील दिली होती.
आज राज्यातील प्रत्येक माणूस शिवरायांच्या या न्यायाची अपेक्षा करत होती. सरकारला सामान्य माणसाची भावना लक्षात यावी म्हणून संभाजी आरमारने हे आंदोलन केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत आरोपीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा भरचौकात ‘चौरंगा’ (हातपाय तोडणे) करून आपला तीव्र रोष व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांनी आरोपीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या कडक शिक्षेचे स्मरण करून देत, या नराधमाचा प्रतिकात्मक पुतळा तयार करण्यात आला होता. या पुतळ्याचे हात-पाय तोडून (चौरंगा करून) समाजात एक कठोर संदेश देण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. या प्रतिकात्मक कृत्यातून लोकांचा कायद्यावरील अविश्वास आणि वाढलेला संताप स्पष्टपणे दिसून येत होता.
यावेळी संघटनेच्या वतीने खलील मागण्या करण्यात आल्या.
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला: या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा. आरोपीला फाशीची शिक्षा: नराधम आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
यावेळी उपस्थित शशिकांत शिंदे (उपाध्यक्ष), गजानन जमदाडे, सागर ढगे, सागर संगवे, संध्या हेब्बाळकर, गव्हाणे, गीता पवार, अश्विनी गायकवाड, कविता पाटसकर
शोभा घंटे, लक्ष्मीबाई कोळी, राज जगताप, तेजस चौधरी, रेवन कोळी, अर्जुन शिवशिंगवाले, द्वारकेश बबलादीकर, अविनाश विटकर, स्वप्निल इराबत्ती, प्रवीण मोरे, सुधाकर करणकोट, संजय तुळशीगार, बाळासाहेब वाघमारे,
अमित जाधव, प्रदीप मोरे आदी उपस्थित होते.


























