Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महायुती सरकारचा दोन वर्षांचा स्वप्नपूर्ती ते वचनपूर्तीचा कार्यकाळ पूर्ण – राजू वाघमारे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 1, 2024
in solapur, top news
0
एकनाथ शिंदे कार्यकाळ पूर्ण करतील; ‘पुन्हा येईन’च्या ट्वीटवर फडणवीसांनी दिलं उत्तर

Mumbai, May 11 (ANI): Maharashtra Chief Minister Eknath Shinde with State Deputy Chief Minister Devendra Fadnavis at Sahyadri Guest House after the verdict of Supreme Court over Maharashtra politics crisis, in Mumbai on Thursday. (ANI Photo)

0
SHARES
64
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, १ जुलै, (हिं. स) राज्यात महायुती सरकारने दोन वर्षाचा स्वप्नपूर्ती ते वचनपूर्तीचा कार्यकाळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशस्वीकरुन दाखवला. महाविकास आघाडीच्या भ्रष्ट सरकारला दुसऱ्या पुण्यतिथीबाबत श्रद्धांजली अर्पण करतो अशी खरमरीत टीका शिवसेना मुख्य सहप्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली. आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

डॉ. वाघमारे म्हणाले की भ्रष्ट आणि काम न करणाऱ्या सरकारपासून या महाराष्ट्राच्या जनतेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी मुक्तता केली आणि महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले.राज्य कर्जात बुडाले आहे अशी टीका करणाऱयांना कर्जाची खरी बाजु व सरकारने राज्याच्या प्रगतीचा खरा आरसा दाखवला असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, दोन वर्षात राज्याने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे.”एफडीआय” आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र विरोधकांचा अभ्यास कमी असल्याने त्यांनी कालपासून अर्थसंकल्पाबाबत खोटे नॅरेटिव्ह पसरवण्याचे काम सुरु केले आहे. राज्यावरील कर्जाच्या बोज्याबाबत डॉ. वाघमारे म्हणाले की, एफआरबीएम कायद्यानुसार राज्याचे कर्ज हे जीडीपीच्या 25% पेक्षा वरती जाता कामा नये असा नियम आहे. मात्र राज्यावर 7 लाख 30 हजार कोटींचे कर्ज असून कर्जाचे प्रमाण फक्त 18.35% इतकेच आहे. त्याशिवाय राज्याला आवश्यक आणखी 1.30 लाख कोटींचे कर्ज घेतले तरी मर्यादेमध्ये ते 21% पर्यंत वाढेल. त्यामुळे राज्यावरील कर्ज नियमात बसणारे आहे, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.

महाराष्ट्राची उत्पादन क्षमता 15 लाख कोटींवर 38 लाख कोटींच्या घरात गेली आहे. राज्यात कर्ज घेऊन पायाभूत सेवा सुविधांचा विकास सुरु आहे. राज्यात उत्पादन क्षमता वाढत असताना खोट्या बातम्या देऊन दिशाभूल करणाऱ्या विरोधकांनी ब्रेन मॅपिंग करणे आणि अभ्यास करुन सरकारवर विधीमंडळाबाहेर टीका करावी, असा टोला डॉ. वाघमारे यांनी लगवला.

ढवळ्या शेजारी पोवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला या म्हणीप्रमाणे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवारांची अवस्था झाली आहे. उबाठा नेते संजय राऊत विजय वडेट्टीवारांना कुठेतरी चावले असावेत, अशी टीका डॉ. वाघमारे यांनी केली. ते म्हणाले की, वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त खर्च करुन राज्य उद्धस्त केले म्हटले होते. यावरुन विरोधीपक्ष नेत्यांच्या हुशारीची किव करावीशी वाटते, अशी टीका डॉ. वाघमारे यांनी केली.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी केलेली टीका म्हणजे नवा जावईशोध आहे. काँग्रेसने जाहीर केलेले 8500 रुपये हे कागदावर होते. ते कोणाला दिले नाही याउलट आमचे सरकार महिलांच्या खात्यात 1500 रुपये देतोय त्यामुळे नानांनी सरकारवर 40% कमिशनचा केलेला आरोप म्हणजे जावईशोध असल्याची टीका केली. विरोधीपक्ष नेत्यांना हप्ते मिळत असल्याने त्यांना काँन्ट्रॅक्टरच्या बिलांची काळजी लागली आहे, असा टोला डॉ. वाघमारे यांनी लगावला.

महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी ज्येष्ठांसाठी तिर्थक्षेत्रांचा दौरा का नाही आणली, पण त्यासाठी डोक्याचा भाग लागतो जो विरोधकांकडे अजिबात नाही. फक्त बडबड करायची, रडायची आणि लोकांना खोटं सांगून त्यांचे नुकसान कसे करता येईल, यासाठी सगळे विरोधक तडफडून जागे झाले आहेत.

दोन वर्षातील महायुती सरकारचे काम आणि अर्थसंकल्पातील सर्व योजना या समाजातील सर्वच घटकांच्या हितासाठी जाहीर करण्यात आल्या आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरली आहे. आगामी निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय होईल, अशी खात्री असल्याने विरोधक अर्थसंकल्पावर बेताल बडबड करत आहे, असे डॉ. वाघमारे म्हणाले.

*उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून काँग्रेसची मोर्चेबांधणी*

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचे म्हटले आहे. मात्र शरद पवारांनी सामायिक चेहरा असावा असे म्हटले आहे तर काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा तूर्त चेहरा जाहीर करण्याची गरज नाही अशी भूमिका घेतली आहे.उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचे काम सुरु असल्याची टीका डॉ. वाघमारे यांनी केली. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकार राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे डॉ. वाघमारे म्हणाले

Post Views: 28
Previous Post

संजय गांधी निराधार योजनाचे चे ८१५ फाइली मंजूर

Next Post

सांगली, मिरज येथील शासकीय रुग्णालये अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज बनविणार – हसन मुश्रीफ

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सांगली, मिरज येथील शासकीय रुग्णालये अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज बनविणार – हसन मुश्रीफ

सांगली, मिरज येथील शासकीय रुग्णालये अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज बनविणार - हसन मुश्रीफ

ताज्या बातम्या

बापरे…..जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते #viral #solapurnews

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल #solapurnews #viral

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल

May 25, 2026

मोदींचे ऐकले गुरुपुष्यामृताला बाजारात खरेदीचा आलेख खाली

May 25, 2026

*warning accident scene* ट्रक- कार अपघात ; आठ जखमी

May 25, 2026

चॅम्पियन ॲक्वॅटीक क्लबच्या वतीने जलतरण स्पर्धा संपन्न

May 25, 2026

सुफियानच्या मृत्यूचे गूढ उकलेना #solapurnews

May 25, 2026
कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

May 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0878862

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697