पंढरपूर – सोलापूर जिल्हास्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा माजीआमदार प्रशांत परिचारक यांनाच निवडणूकीच्या आखाड्यातउतरविले जाण्याचा विश्वास परिचारक समर्थक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. कारणभाजपा हा शिस्तप्रिय पक्ष आहे. त्यामुळे भाजपा मध्ये ज्या मतदार संघात भाजपाचा जो उमेदवारप्रतिनिधीत्व करीत असतो त्याच्याचा नावाचा पुन्हा निवडणूकीत उमेदवारी देताना पहिल्यांदाविचार केला जात असतो. त्यामुळे सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातूनयावेळेला भाजपाकडून उमेदवार म्हणून प्रशांत परिचारकांनाच पुन्हा एकदा संधी दिली जाण्याचाविश्वास परिचारक समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.
——————-
चौकट : ( अनिल
सावंतांची देखील लढण्याची तयारी ) सोलापूर जिल्ह्यात भाजपचे संख्याबळ पाहता या जागेसाठी अनेकजण इच्छुक दिसत आहेत.तर दुसरीकडे भाजपच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी त्यांच्या मित्रपक्षांसह महाविकास आघाडीकडूनही पडद्यामागून काही हालचाली सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. येथून भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत हेनिवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याचे समजते. ते माजी मंत्री व शिंदे शिवसेनेचेनेते डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत. अनिलसावंत यांचे मोहिते पाटील तसेच अभिजीत पाटील आदींसह भाजपामधील काहीजणां बरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
—————
चौकट: ( मित्रपक्षांची भूमिका देखीलअसणार महत्वाची )
महायुतीचे संख्याबळ पाहता येथील विधानपरिषद निवडणूक ही भाजपसाठी अत्यंत सोपी आहे. भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणुकीत मिळविलेले घवघवीत यश पाहता जिल्ह्याचा आमदार याच पक्षाचा होणा रहे निश्चित मानले जात आहे. मात्र, याच जिल्ह्यात भाजपने ऑपरेशन लोटस राबविताना नगरपरिषद, महापालिका व पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत मित्रपक्षांनाही सोडले नाही. अनेक ठिकाणी तर शिंदे शिवसेनेबरोबर त्यांच्या लढती झाल्या आहेत. यामुळे आता विधान परिषदनिवडणुकीत मित्रपक्ष कोणती भूमिका घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
——————-
चौकट : (काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकापची ताकद असताना परिचारक झाले होते विजयी)
२०१६ मध्ये प्रशांत परिचारक ह ेमहायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते. भाजप व मित्रपक्षाची कमीमते असतानाही परिचारक विजयी झाले होते. स्व.सुधाकरपंत परिचारक यांचा करिष्मा त्यावेळी जिल्ह्यानी अनुभवला होता. (कै.)पंतांच्या शब्दाला जिल्ह्याच्या राजकारणात असणारा मान त्यावेळी पाहावयास मिळाला होता. वास्तविक पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप यापक्षांची जिल्ह्यात त्यावेळी ताकद मोठी असतानाही प्रशांत परिचारक आमदार म्हणून निवडले गेले होते. अनेक अदृश्य शक्तींनी त्यांना साथ केली होती. त्यामुळेच काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शेकापचीजिल्ह्यात ताकद असताना परिचारकांनी विजयश्री खेचून आणली होती.
—————-
चौकट : ( जिल्ह्यात पहिल्यांदा परिचारकांचा भाजपाशी दोस्ताना ) २०१४ पूर्वीपासून परिचारक यांनी राष्ट्रवादी पासून फारकत घेत देवेंद्र फडणवीस यांची साथ केली व सोलापूर जिल्ह्यात भाजपचा विस्तार केला तसेच येथे राजकीय बस्तान बसविण्यासाठी मदत केली. अनेक नेत्यांना भाजपच्या जवळ आणले. त्यामुळे जिल्ह्यात भाजपाचे बस्तान बसविताना परिचारकांची चांगलीच साथ भाजपाला झाल्याचे भाजपाचे वरिष्ठनेते देखील खासगीत सांगताना ऐकावयास मिळतात. ————————
चौकट : ( भाजपाकडून उमेदवारीबाबत परिचारकांना शब्द )
२०२४ मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, आमदार समाधान आवताडे हे २०२१ ला विजयी झाल्याने सहाजिकच त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. तेव्हा परिचारक यांना विधानपरिषद दिली जाईल, असे सांगितले जात होते. नुकत्याच विधानपरिषदेच्या नऊ जागा भरल्या गेल्या आहेत, त्यावेळीही परिचारक यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून संधी मिळेल, असे आश्वासन भाजपाच्या वरिष्ठांनी दिल्याचे परिचारकांचे समर्थक सांगतात. दरम्यान, सध्या भाजपमध्ये अनेक मातब्बर गट आले असून सर्वांनाच विधानपरिषदेची अपेक्षा आहे. मात्र, जिल्ह्यातभाजपचे अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या परिचारकांना संधी मिळेल असा विश्वास परिचारक समर्थकांना आहे.
——————–
चौकट : ( परिचारकांच्या जागेवर परिचारकांचा अधिकार )
विधानपरिषद निवडणूकीच्या आखाड्यात भाजपाकडून परिचारकांनाच उतरविले जाणारअसल्याचा विश्वास परिचारक समर्थकांना आहे. कारण भाजपाच्या धोरणा नुसार ज्या मतदार संघाचा जो आमदार असेल त्यालाच निवडणूकीसीठी उमेदवार म्हणून पहिली पसंती दिली जात असते. गेल्या निवडणूकीत भाजपाचे फारसे संख्याबळ नसताना जिल्ह्यात विरोधकांचा दबदबा असताना देखील परिचारकांनी विजयश्री खेचून आणलेली होती. भाजपा हा शब्द पाळणारा पक्ष आहे. तो काम करणाऱ्या नेत्याच्या, कार्यकर्त्यांच्या पाठीशी कायमच राहिलेला आहे. त्यामुळे परिचारकांच्या कामाची त्यांच्या त्यागाची या पक्षाकडून निश्चितच दखल घेतली जाईल. त्यामुळे परिचारकांच्या जागेवर परिचारकांचाच हक्क असल्याचा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे.
———————
चौकट : ( विधानपरिषदेसाठी जिल्ह्यात असे आहे एकंदर संख्याबळ )
सोलापूर जिल्ह्यात विधानपरिषदेसाठी ५०१ मतदार असून यापैकी २६२
हे भाजपचे आहेत.तर महाविकास आघाडीचे संख्याबळ हे ७० इतके असून महायुतीमधील घटकपक्ष असणाऱ्या शिंदेशिवसेनेचे ७१ तर अजितदादा पवार राष्ट्रवादीचे ४७ सदस्य आहेत. यामुळे ही निवडणूकभाजपसाठी सोपी मानली जात असली तरी अन्य पक्षांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे.
Post Views: 5