पंढरपूर – विश्वमंगल मराठी फाउंडेशन आयोजित संवाद बैठक नुकतीच येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मराठी भाषा, संस्कृती, शिक्षण, उद्योग, पर्यावरण आणिसामाजिक विकास या विविध विषयांवर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या प्रस्ताविकात फाउंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या स्थापनेमागील उद्देशस्पष्ट केला. मराठी भाषिक व्यावसायिकांना एकत्र आणणे, मराठी भाषा वसंस्कृतीचे जतन-संवर्धन करणे तसेच “लोकमंगल ते विश्वमंगल” हा प्रवास कशा पद्धतीने घडला याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी विविध सामाजिककार्याचीही माहिती उपस्थितांसमोर मांडली. तसेच आ.सुभाष देशमुख यांच्या सामाजिक कार्याची मांडणी यावेळी केली.
सोळा देशांमध्ये वास्तव्यास राहून विविध क्षेत्रांचा अनुभव घेतलेले सुरेश देशमुख यांनी फाउंडेशनच्या संघटनात्मक रचनेबाबत माहिती दिली. राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर समित्या गठीत करून विश्वमंगलची चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी भूषण कुलकर्णी यांनी विश्वमंगल बिझनेस नेटवर्क अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या “विश्वमंगल बिझनेस डेव्हलपमेंट फोरम” विषयी माहिती दिली. ग्रामीण भागातील उद्योजक, व्यापारी आणि व्यवसायिकांना एकत्रआणून परस्पर सहकार्य, उद्योगवाढ, मार्केटिंग, चर्चासत्रे आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीसाठी कार्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “एकमेका सहाय्यकरू, अवघे होऊश्रीमंत” हे ध्येय समोर ठेवून फोरम कार्य करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पंढरपूरमध्ये या फोरमची पहिली शाखा सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
गणेश पाटील यांनी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. भंडीशेगाव येथे ४२ एकर परिसरात २० हजार झाडांची लागवड, चिंचणी येथील ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र, सरकोली पर्यटन केंद्र, भालेवाडी एकात्मिक पर्यटन केंद्र अशाविविध प्रकल्पांचा त्यांनी उल्लेख केला. राज्य, देश आणि विदेश स्तरावर कार्यविस्तारासाठी विश्वमंगल मराठी फाउंडेशनची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विदेशात कार्यरत असलेल्या मराठी बांधवांना गाव विकासासाठी जोडण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
यावेळी भूषण कुलकर्णी, सुरेश
देशमुख, अनंता चव्हाण, मोहन अनपट, समाधान काळे, शशिकांत कराळे, विलास भोसले, श्रीकांत दवले, संतोष दळवी, सुभाष खटावकर, भीमाशंकरकुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
————–
चौकट : ( पंढरपूर बिझनेस डेव्हलपमेंट फोरमची अधिकृत स्थापना )
विशेष म्हणजे, पंढरपूर बिझनेस
डेव्हलपमेंट फोरमची अधिकृत स्थापना यावेळी करण्यात आली. विविध क्षेत्रातील ४० व्यावसायिकांचा फोरम तयार करण्यात आला असून, व्हीएमबीएन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून सर्व व्यवसायिकांना एकत्र जोडले जाणार आहे. व्यवसाय वाढ, परस्पर सहकार्य, मार्केटिंग नियोजन, देवाण घेवाण आणि साप्ताहिक बैठकींच्या माध्यमातून नेटवर्क अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा करण्यातआली.
—————
चौकट : पांडुरंगाच्या आशीर्वादाने १ मे रोजी आळंदी येथे विश्वमंगलचीस्थापना करण्यात आली. सकारात्मक विचार, सामाजिक बांधिलकी आणि लोक सहभागाच्या माध्यमातून गाव, जिल्हा आणि राज्य विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन यावेळी सुभाष देशमुख यांनी केले. या बरोबरच सरकोली, चिंचणी, भालेवाडी, भेंड, भंडीशेगाव, चिनके आणि वाडीकुरोली यांसारखी गावे जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असून मराठी व्यवसाय, मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन वसंवर्धन करण्यासाठी विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Post Views: 6