Tuesday, June 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

देशात मोदी नावाचा प्रभाव कायम

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 11, 2024
in maharashtra
0
देशात मोदी नावाचा प्रभाव कायम
0
SHARES
69
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देशात सध्या लोकसभा निवडणुकींची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. मोदींनी आजवर केलेल्या कामाची आकडेवारी व देशाची प्रगती याचे आकडे लोकांसमोर पुराव्यासह दिले आहेत. त्यावर वृत्तवाहिन्या व मोदी ऍप वरून कायम माहिती मिळत असते. साधे उदा. द्यायचे झाले तर महाराष्ट्रातील नुकताच बांधला गेलेला अटल सेतू, मुंबई मेट्रोचे जाळे, देशात उभारलेले विक्रमी हायवेज, रेल्वेचे झालेले बदल, एम्स हॉस्पिटल्स व कॉलेजेस, आयआयटी पासून अनेकविध योजनांची उदा. देता येतील.. सैनिक मेमोरियल, सीमेवर रस्ते बांधणी, सीमेचे सशक्तीकरण, डिफेन्स उपकरण यांचे उत्पादन, सर्जिकल स्ट्राईक, कलम ३७० व राम मंदीर उभारणी हे राष्ट्राचे मानबिंदू ठरलेले आहेत. भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यात सर्व आलेले आहेच पण मोदींच्या कामाचा लेखाजोखा सर्वत्र उपलब्ध आहे. पूर्वी पद्म पुरस्कार हे विशिष्ठ घराणी व देशातील प्रतिष्ठित व्यक्तींना दिले गेलेले आपण पाहिले असतील आज हे पुरस्कार तळागाळात काम करणाऱ्या लोकांना दिले गेलेत त्यात कुठला धर्मभेद पाहिलेला नाही.

सर्वात महत्वाचे म्हणजे मोदी सरकार मधील एकाही व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. शेअर बाजाराचे महत्व जागतिक बाजारपेठेत न भूतो न भविष्यती वाढले आहे. मोदींनी देशासाठी न थकता काम करण्यात सातत्य ठेवलं आहे. एकही आरोप कोर्टात सिद्ध झालेला नाही उलट आरोप करायला गेलेल्या लोकांना माफी मागावी लागली. उदा. राफेल बाबत राहुल गांधी. सत्याचा आव आणणारा इंडी आघाडीचा सदस्य केजरीवाल जेल मध्ये गेला आणि बाहेर येत नाही म्हणजे केस मध्ये मेरिट आहे. आरोपात तथ्य आहे. पण त्याउलट सतत हे दिसून येते की विरोधी पक्ष भ्रष्टाचाराचे आरोप करतो जे कोर्टात टिकू शकत नाहीत व बदनामी करण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करतो. खोटे मेसेजेस टाकतो ज्याला काही ब्रँडेड वृत्तपत्राच्या बातमीचा आधार नसतो. ना कुठल्या गोष्टीची किनार असते.

राज्यात बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे यांचे उरलेले कार्यकर्ते भाजप बाबत मनुवादी कावा व ही संविधान वाचवायची लढाई आहे अस भाषणातून म्हणू लागले आहेत. ते स्वतः तर पक्षाची अस्तित्वाची लढाई कोर्टात निम्मी हरले आहेत. त्यांची निशाणी व पक्ष शिंदेंनी हातातून खेचून नेला आहे. त्या कार्यकर्त्यानी परवलेल्या विक्रमी अफवांची तर गिनीज बुकात नोंद करावी इतके ते खोटे ठरले आहेत. देशभरात जे चोर एकत्र आले त्यांच्या टेम्पोत हे संस्कार विसरून जावून बसले. निवडणूक आली की अजून एक मुद्दा जोर धरतो तो म्हणजे मोदी व शहा हे गुजराती असून त्यांना मुंबई ही आर्थिक राजधानी गुजरातला न्यायची आहे. सारासार विचार केला तर हे कुर्ल्याची लोको शेड कर्जतला येणार आहे इतके सोपे आहे का? जेव्हा हे मुंबई महापालिकेत सत्तेत होते तेव्हा यांनी परप्रांतीय लोकांना रेशन कार्ड दिले नाही का? यांच्या काळात बांगलादेशी घुसखोर आले नाहीत का? मराठी माणसाचा जो टक्का कमी झाला तो काय अबू आझमीने कमी केला?

विरोधी पक्षाकडे सर्वांत महत्त्वाचं सद्याच हत्यार आहे अफवा पसरवणे व लोकांना घाबरवणे व त्यात भक्त मात्र पिछाडीवर आहेत. आमचे उजवे फक्त कायदेशीर आधार असलेल्या बातम्या छापतात. काय चुकीचे काय बरोबर यावर साधक बाधक चर्चा करतात. राष्ट्रवादीला सोबत घेतले म्हणून नाराजीचा सुर जाहीरपणे आणतात. आरे ही राष्ट्राची निवडणूक आहे जिथे परस्पर विरोधी असलेले शेकडो पक्ष बेरजेच्या गणितासाठी एकत्र येऊ शकतात तिथे एक राष्ट्रवादी सोबत आली तर कुठे बिघडले? तुम्ही स्थानिक पक्षाला नाही तर मोदींना मतदान करत आहात. त्यांच्या अफवांना बळी न पडता आता सत्यवादी स्वभाव आड येतो आहे तर हे चुकीचे आहे. काही लोकसभा निवडणुकीत पांढरपेशी विद्वान निवडणुकीत मतदान करायला गेले नाहीत हे सर्वाधिक घातक आहे. या सर्व लोकांच्या केंद्रस्थानी नेतृत्व भाजपचे आहे हे लोक विसरले. मेहबूबा मुफ्ती सोबत घेऊन भाजपने ३७० हटवले. त्यामुळे युतीचा जो उमेदवार आहे त्याला मतदान करायला हवे. तुमच्या तत्वामुळे येणाऱ्या पिढ्यांचे अपरिमित नुकसान झालं तर पश्र्चाताप करण्यासारखं दुसर काही नसेल.

अजून एक महत्वाची अफवा इंडी आघाडी अशी पसरवत आहे की मोदी सरकार जाणार आहे म्हणून गुप्तचर विभागाचा अहवाल असल्याने व ग्राउंड रिपोर्ट असल्याने प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या अनेक अधिकारी व्यक्ती यांनी त्यांच्या राज्यात जायचे अर्ज केले आहेत. या बातमीला काही आधार ना आगा न पिच्छा. घरी बसून सरकार चे १०० खोके दर महिन्याला मोजणाऱ्या व्यक्तीचे समर्थक या पुड्या सोडत आहेत. हिंमत असेल तर अशी बातमी ब्रँडेड वृत्तपत्रात छापून आणा. सामान्य माणसांनी जेव्हा मोदी व मनमोहन सिंग यांची तुलना करणारी बातमी छापून येते तेव्हा ती बातमी कुठल्या पुराव्याचे आधारावर व कोणत्या न्युज माध्यमात येते त्याचा ब्रँड चेक करावा. कुठले व्हॉट्स अप मेसेज व पादरे पोर्टल यावर काडीचा विश्वास ठेवू नये.

अजून एक महत्वाची अफवा आरक्षण हटवण्याबाबत पसरते जे आरक्षण कोर्टात वैद्य ठरत ते आरक्षण कायद्याने हटू शकत नाही. मोदींनी आरक्षण म्हणून गरीबांना धान्य दिलेलं नाही. जे धान्य अडवून व सडवून दारू बनवण्यासाठी मुद्दाम पाठवल जायचं ते आज गरिबाच्या पोटात जात आहे. देशातील गोदाम उंदरांनी भरलेली होती ती आज सुरक्षित आहेत. प्रत्येक घरी आज जलजिवन मिशन चे नळ आणि ग्रामीण भागात शौचालय पोचले. जो राहुल गांधी लोकांच्या खात्यात पैसे टाकायचे म्हणतो आहे ती खाती सुद्धा काँगेस काळात नव्हती ती खाती बिना पैश्यात मोदी सरकारच्या काळात उघडली गेली आहेत.

नुकताच पुण्यातून एका इस्लामिक संस्थेने जाहीरपणे इंडी आघाडीला त्यांच्या धर्माच्या व्यक्तींना बोलवून पाठींबा दिल्याचा व्हिडिओ फिरतो आहे. याकूब मेमन मेमोरियल बांधण्याचे ज्यांनी स्वागत केले त्या व्यक्तींना हा पाठींबा साहजिक आहे पण हे ही लक्षात घेऊन काही लोक अफवांना भुलले आणि राष्ट्रवादीला सोबत घेतल म्हणून निषेधाने मतदान करायला नाही गेले तर त्यांना पुढच्या पिढ्या माफ करू शकत नाहीत याचे भान असायला हवे. ज्यांच्यात विस्तव जात नव्हता अशा व्यक्ती एकत्र का आल्या? याचे कारण त्यांना मोदींच्या व्हिजन ची भीती झाली. त्यांना जेल मध्ये जायची भीती झाली. पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला म्हणून ही अभद्र युती पुढे आली.

इंडी आघाडीत महराष्ट्रातील असे दोन माजी मंत्री आहेत जे जेल मध्ये होते. ते अजून निर्दोष सुटलेले नाहीत. जामिनावर बाहेर आहेत. अजून एकही व्यक्तीला क्लीन चिट दिल्याची बातमी बाहेर आलेली नाही. मिळणार देखील नाही. उलट त्यांच्यातल्या नेत्यांचे वक्तव्य पाहा. ते विकास व भ्रष्टाचार विषयात काय बोलतात? ते आम्ही घरी का बसून कारभार करत होतो त्यावर बोलतात? आमचे पक्ष हातातून का गेले त्यावर बोलतात? केजरवाल सुटत का नाही त्यावर बोलतात?

शरद पवार धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना चिडले. म्हणाले हा छोट्या कुटुंबातला व छोट्या समाजाचा मुलगा त्याला आम्ही जी मदत केली त्याची जाण राहिली नाही. छोटे कुटुंब व छोटे समाजाचे लोक नेतृत्व करू शकत नाहीत?

इंडी आघाडीने अजून एक चमत्कारिक काम केलं आहे ते म्हणजे एक्झीट पोल वाढून चडवून दाखवणे. हे कुठून होते? अशाच प्रकारचे पोल्स मध्ये पाच राज्याच्या निवडणुकीत यांच्याच बाजूने आलेले. हे लोक मात्र त्या निवडणुका हारले. सर्वत्र भाजप सरकार अल. फक्त पंजाब मध्ये सक्सेस ठरले. त्यामुळे याच्यावर किती विश्वास ठेवायचा ते जनतेने लक्षात घ्यावं. सोशल मीडियावर होणारे मतदान गावातील जनता करत नाही. व ही सामान्य जनता जागरूकतेने अजून पुढे गेलेली आहे. त्यांच्यापर्यंत गरीब कल्याणच्या योजना पोचल्या आहेत. किसान सन्मान निधी मिळतो आहे.

जागरूक नागरिक यांचे अजून एक चुकते हे नागरिक मतदानाला न जाता देशातील सिस्टीमलां शिव्या देतात. त्यानी मतदानाला बाहेर पडावं. देशात गेल्या दहा वर्षात बदल घडलेला आहे. त्याचे साक्षीदार व्हावं व भारताला पुढील १०० वर्ष सक्षक्त करण्या करिता आपण मोदींना मतदान करून योगदान द्यावं. युतीच्या कार्यकर्त्यांनी अफवा पसरविणारे मेसेज दिसले की त्याची खबर निवडणूक आयोगास पुराव्यासह ईमेल करून द्यावी. त्याची तत्काळ दखल घेतली जाऊन कारवाई होते.

देशात मोदींचीच हवा आहे. महाराष्ट्र राज्यात तर सकारात्मक वातावरण आहे. इंडी आघाडी अफवा पसरवत आहे त्याचा सर्वांनी कायदेशीर बीमोड करावा. आपण मतदान करावे व दुसऱ्यांना यांच्या अफवांचा व फतव्याचा दाखला द्यावा. सर्वांचे मतदान करूनच १०० कोटी वसुली व जातीयवादी दंगली घडवणाऱ्या लोकांपासून आपण राज्याचे रक्षण करू शकतो.

Post Views: 77
Previous Post

नकली राष्ट्रवादी, शिवसेनेने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे ठरवलेय – पंतप्रधान

Next Post

भेंडवळची भविष्यवाणी : पीक, पाऊस उत्तम, पिकांवर रोगराई

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भेंडवळची भविष्यवाणी : पीक, पाऊस उत्तम, पिकांवर रोगराई

भेंडवळची भविष्यवाणी : पीक, पाऊस उत्तम, पिकांवर रोगराई

ताज्या बातम्या

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

June 15, 2026

सांगोला पोलिसांची अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई

June 14, 2026

गोंदवले मसवड देवदर्शन करून येणाऱ्या पंढरपूरच्या भाविकांच्या पिकप ला अपघात पिकप विहिरीत पडून ८ जणांचा मृत्यू ७ जण जखमी  !

June 14, 2026

छोटा हत्ती विहीरीत पडुन  आठ जणांचा दुर्दैवी मृत्यु

June 14, 2026
प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

June 14, 2026
योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

June 14, 2026
लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

June 14, 2026
श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

June 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0912000

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697