Tuesday, July 1, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

क्लायमेट फंडिंगसाठी सीएसआर मॉडेलचा वापर – रामनाथ वैद्यनाथन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 27, 2023
in maharashtra
0
क्लायमेट फंडिंगसाठी सीएसआर मॉडेलचा वापर – रामनाथ वैद्यनाथन
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हवामान बदलामुळे तयार होत असलेली गंभीर परिस्थिती आता आपल्या अगदी जवळ येऊन ठेपली आहे. आजच्या युगात आपल्या कृतीचे काय परिणाम होत आहेत याविषयी उघडपणे बोललं जातंय. या संकटावर मात करण्याची घाई आपल्याला झालेली असली, तरी त्यासाठी किंमत कोण मोजणार हा खरा मुद्दा आहे.

हवामान बदलाचे परिणाम कमी करणं आणि त्याच्याशी जुळवून घेणं यासाठी प्रचंड मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. आजचा काळ आणि २०५० दरम्यान जगभरातील सरकार आणि खासगी क्षेत्राला उर्जा स्थित्यंतरासाठी १३१ ट्रिलियन डॉलर्स गुंतवणुकीची गरज आहे. एकट्या भारतातच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हवामान बदलास तोंड देऊ शकतील अशा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी २०५० पर्यंत ७.२ ट्रिलियन ते १२.१ ट्रिलियन डॉलर्सची गरज भासणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की भारताने (आणि विकसनशील जगातील पर कॅपिटा कमी उत्सर्जन असलेल्या इतर देशांनी) या स्थित्यंतराची किंमत मोजावी का?

मुळात विकसित देशांनी २००९ मध्ये सीओपी १५ (एनएफसीसीसी, कोपेनहेगन) येथे जाहीर केलेला आपला शब्द आणि बांधिलकी पाळणे व डिकार्बनायझिंगसाठी जाहीर केलेला निधी देणं आवश्यक आहे. विकसित देशांनी विकसनशील देशांना कमी कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने स्थित्यंतर करण्यासाठी पुरवल्या जाणाऱ्या निधीत विसंगती अथवा पारदर्शकतेचा अभाव असणं किंवा थेट निधीच न पुरवणं स्पष्टपणे दिसून येत आहे. आश्वासन देऊन दशके झाली, तरी पुरवला जाणारा निधी अतिशय तुटपुंजा आहे. हे भांडवलाची उणीव असल्यामुळे होत नाहीये, तर डिकार्बनायझिंगला कमी प्राधान्य दिले जात असल्याने होत आहे. अल्पावधीत मोठ्या बांधिलकीची अपेक्षा करणं भोळेपणा आहे, मात्र कामगिरी साध्य केल्यानंतर टप्प्याटप्प्याने निधी पुरवून जबाबदारीचे योग्य पालन केले जात आहे, की नाही तसेच निधीचा योग्य वापर केला जात आहे, ना हे तपासणे आवश्यक आहे.

त्याशिवाय हा निधी पूर्णपणे कर्ज स्वरुपात नसेल आणि विकसनशील देश परतफेडीच्या अंतहीन चक्रात अडकणार नाहीत हे पाहाणंही महत्त्वाचं आहे. त्यांचं सार्वभौमत्व जपलं गेलं पाहिजे. किंबहुना एखादी मोठी रक्कम त्यांना अनुदान किंवा मदतीच्या स्वरुपात दिली गेली पाहिजे. विकसित देशांनी विकसनशील देशांचे पर्यावरण, आर्थिक आणि सामाजिक शोषणातून भरपूर लाभ करून घेतला आहे आणि त्याशिवाय त्यांना आज दिसत असलेली समृद्धी मिळालेली नसती. त्यांनी गैरमार्गाने कमावलेल्या संपत्तीचा काही भाग कर्ज म्हणून देऊन व्याजाच्या रूपात आणखी उत्पन्न कमावणं हे निव्वळ अन्यायकारक आहे. ‘जो करतो, तो भरतो’ हे तत्व इथे लागू होत नाही, तर प्रती कॅपिटा उत्सर्जनानुसार जबाबदारीचे वाटप करणं आवश्यक आहे.

या निधीचा कशाप्रकारे वापर केला जातो हे तपासणंही महत्त्वाचं आहे आणि प्रगतीवर पारदर्शक पद्धतीने देखरेख करण्यासाठी योग्य प्रशासकीय यंत्रणा असायला हवी. विकसनशील देशात भ्रष्टाचार जास्त असतो आणि ते दिलेल्या निधीचा योग्य वापर करणार नाहीत हा सर्वसामान्य गैरसमज आढळून येतो. अशाप्रकारच्या वृत्तीवर मात करणं गरजेचं असून व्यापक देखरेख आणि प्रशासकीय यंत्रणा गरजेची असल्याचे मला मान्य आहे, मात्र ती जागतिक, सर्वसमावेशक आणि पूर्वग्रहविरहीत असणंही आवश्यक आहे. भारतीय सीएसआर मॉडेल हे अनुकरणीय आहे. त्यात बजेट, निष्कर्ष, कामगिरीचे टप्पे, ऑडिट आणि वापर या सर्व घटकांचे पालन करणे बंधनकारक असते.

ही उद्दिष्टे आणि कामगिरीचे टप्पे त्या त्या देशानुसार, त्यांच्या विकासाची पातळी, लोकसंख्या व आर्थिक स्थितीप्रमाणे असायला हवी. उदा. भारतात शेतीचा उत्सर्जनातील वाटा सर्वात जास्त आहे, तर त्या क्षेत्रातील प्रकल्पांना प्राधान्य दिले गेले पाहिजे. मात्र, इंडोनेशियामध्ये जीवाश्मनिर्मितीपासून रिन्युएबल्सकडे नेणाऱ्या स्थित्यंतरावर जास्त लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. म्हणूनच वेगवेगळे देश त्यांच्या उद्दिष्टांसह निधीचा अर्ज दाखल करतील तसेच त्याच्या वापरासाठी कोणते धोरण अमलात आणले जाईल याचीही माहिती देतील. जागतिक स्तरावरील मॉनिटरिंग एजन्सी (चालू आर्थिक यंत्रणेच्या बाहेर तयार करण्यात आलेली) या निधीचे वितरण करेल आणि प्रगतीवर देखरेख करेल.

काही जण खासगी वित्ताची मागणी करतील, तर काही कॉर्पोरेट्सकडून निधीची मागणी करतील आणि त्याचा क्लायमेट फंडिंग क्षेत्रातली दरी भरून काढण्यासाठी प्रामुख्याने कसा वापर केला जाईल हे पाहावं लागेल. खासगी वित्त क्षेत्राला हवामानाची जोखीम कमी करण्याच्या क्षेत्रात विस्तार करण्याची संधी असून काही कंपन्या त्यांच्या कामकाजाबरोबरच, मूल्य साखळी आणि पुरवठा साखळीतील काही भागामुळे होणारा पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी गुंतवणूक करायला लागल्या आहेत. हवामानानुसार लवचिकता आणण्यासाठी आणि योग्य पद्धतींचा अवलंब करण्यासाठी काही कंपन्यांनी आपली गुंतवणूक वाढवली आहे. हवामान स्थित्यंतराचा संपूर्ण आर्थिक भार त्यांच्यावर टाकणं हे त्या कंपन्या तसंच त्या कार्यरत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठीही घातक ठरू शकतं.

सारांश इतकाच, की जर हवामानातील बदलांमुळे तयार झालेल्या संकटाचे निवारण करण्यात जगभरातील सर्वच देशांचे प्रयत्न कमी पडत असतील, तर त्यांना आगामी पिढ्या आणि पृथ्वीचे अपराधी म्हणावे लागेल. विकसित देशांनी या जबाबदारीचे समान वाटप व्हायला हवे अशी भूमिका घेणे बंद करून त्याऐवजी नैतिकदृष्ट्या योग्य काम करावे. संयुक्त राष्ट्रांनी वार्षिक पातळीवर १०० अब्ज डॉलर्स हा केवळ प्राथमिक टप्पा आहे, कमाल मर्यादा नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. हवामान बदलांसाठी आर्थिक निधी गरजेचा आहे यावर वाद करण्याचे दिवस आता संपले आहेत आणि आपण त्यासाठी तातडीने गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. हे दशक निर्णायक ठरेल आणि त्यातून आपण अधिक शाश्वत व समान भविष्याच्या दिशेने जाऊ याची खात्री करणं महत्त्वाचं आहे.

रामनाथ वैद्यनाथन, एव्हीपी आणि प्रमुख – पर्यावरणीय शाश्वतता – गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड आणि असोसिएट कंपनीज

Previous Post

यूपीएल एसएएसचा एनएसएल शुगर्सबरोबर सामंजस्य करार

Next Post

पश्चिम बंगालमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, आठ ठार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पश्चिम बंगालमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, आठ ठार

पश्चिम बंगालमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, आठ ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

June 20, 2025
‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 1, 2025
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

March 22, 2025
मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

March 3, 2025
मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

March 3, 2025
वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

March 3, 2025
धुळे : घरफोडी करणा-या अट्टल चोराला धुळे तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले

पंकज नगरात घरफोडी; रोख ५ हजार रूपयांसह लाखोंचे दागिने चोरून नेले

March 3, 2025
लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसलेल्या महिलेनं एका पिग्मी एजंटला २५ हजार रुपयांना लुटलं….

रात्री दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्या मुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले

March 3, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2024
0

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 26, 2024
0

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 23, 2024
0

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 19, 2024
0

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 17, 2024
0

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

Load More

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2025
0

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 30, 2024
0

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...

बार्शी विधानसभा २४६ मधील सकाळी ७ ते ९ मध्ये झालेले मतदान.

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी सुभाष देशमुख 94 हजार754 अमर पाटील 36हजार 724हजार

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group