शिक्षण विभागाकडून प्रत्येकी दिवशी एक कृतिशील उपक्रम,
नव्या बदलासाठी तालुक्यात सोमवारपासून शिक्षण सप्ताह l
मुख्याध्यापक तालुका स्तर कार्यशाळा संपन्न – सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सहभाग सहभाग घेण्यासाठी केले अहवाहन– अशोक सोळंके गटशिक्षणाधिकारी
मंठा 20. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शिक्षण व
विकासाच्या विविध पैलूंचा अभ्यास व्हावा, यासाठी शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला आहे. २२ जुलैपासून साहित्य
दिवसापासून या सप्ताह सुरुवात होणार आहे. तर २८ जुलै रोजी समुदाय अध्ययन-अध्यापन जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन व
माध्यमांच्या शाळांमधून येत्या २२ ते २८ जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.सर्व विद्यार्थी, शिक्षक , मुख्याध्यापक व पालकांनी सहभाग घेणे साठी केले अहवाहन,
अशोक सोळंके गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक कार्यशाळा मध्ये सांगितले की,
आठवडाभर प्रत्येक दिवशी विशिष्ट उपक्रम राबविण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. २२ जुलैपासून अध्ययन-अध्यापन साहित्य
दिवसापासून या उपक्रमात सुरुवात होणार आहे. २३ रोजी मूलभूत क्रीडा दिवस, २५ रोजी सांस्कृतिक दिवस, २६ रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम २७ रोजी मिशन लाइफच्या
दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस व २८ जुलै रोजी म्हणजेच शिक्षण सप्ताहाच्या सांगते प्रसंगी समुदाय सहभाग दिवस साजरा करण्यात येणार.
नव्या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विविध शाळेत विद्यार्थी उपक्रम राबविण्यात यावेत, अशा सूचना गट शिक्षणाधिकारी यांनी या वेळी दिल्या आहेत.
—————————
बारावीचे विद्यार्थी मतदार नोंदणी जण जागृती करणार आहेत व 18 वर्ष झालेले विद्यार्थी 100 % नोंदणी करणार आहेत.
शैक्षणिक सप्ताहाची २२ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या
पहिल्याच दिवशी 1ली ते 10 वीच्या विद्याथ्र्यांना विविध
उपक्रम देण्यात येणार आहेत. यामध्ये घोषवाक्य असलेले
पोस्टर तयार करावयाचे आहेत. त्यात ‘पाणी कसे वाचवायचे’
आणि इतरांना कशी मदत करावी’ हे विषय त्यासाठी ठेवण्यात
आले आहेत. विज्ञान आणि गणित या विषयावर अधिक लक्ष
केंद्रित करणारी कोडी तयार करावी लागणार आहेत.
त्याचबरोबर सामाजिक शास्त्रे, विज्ञान,गणित,आणि भाषा आदी विषयांशी संबंधित खेळही होणार आहेत.
पहिल्याच दिवशी इयत्ता 5वी ते 10 वी तील विद्यार्थी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश विद्यार्थी रॅली काढून देणार आहेत.
——————————
समारोपाला साजरा होणार शैक्षणिक उत्कृष्ठतेचा उत्सव.
विद्यांजली हा शिक्षण मंत्रालय अंतर्गत शालेय शिक्षण आणि
साक्षरता विभागाद्वारे चालवला जाणारा एक महत्त्वाकांक्षी
कार्यक्रम आहे.विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माजी विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक,शास्त्रज्ञ, सरकारी, निमशासकी अधिकारी, सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे कर्मचारी हे त्यांचे ज्ञान आणि कौशल्य शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करू शकतात त्यामुळे समारोपाला शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव साजरा होणार आहे, असे एका प्रसिदधी पत्रकाद्वारे शिक्षण विभागाने कळविले आहे.
भारतीय संस्कृती जपण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन शाळा स्तर करावे असे अहवाहन मुख्याध्यापक कार्यशाळा मध्ये करण्यात आले आहे.
गटसमनवक्यक के जी राठोड , केंद्रप्रमुख , सर्व शाळा मुख्याध्यापक , समग्र शिक्षा स्टफ व नोडल अधीकारी या वेळी उपस्थित होते.
सुरज जाधव यांनी आभार मानले.