Monday, June 30, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेतीला सौर ऊर्जा, शेतकऱ्यांमध्ये चैतन्य

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 13, 2024
in top news
0
शेतीला सौर ऊर्जा, शेतकऱ्यांमध्ये चैतन्य
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देशातील ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी सुमारे 22 टक्के वापर होतो. महाराष्ट्रात सुमारे 45 लाख कृषी वीज ग्राहक असून ते वीजेचा वापर हा मुख्यत: कृषी पंपासाठी करतात. शेतकऱ्यांना पूर्वी चक्रीय पद्धतीने दिवसा आणि रात्री वीजपुरवठा केला जात होता. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात सिंचन करताना अनेक अडचणींना सामना करावा लागत असे. यावर उपाय म्हणून शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ 14 जून 2017 साली सुरू केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी या योजनेत आवश्कतेनुरूप बदलही करण्यात आले. तथापि, या योजनेच्या अंमलबजावणीचा अनुभव व आव्हाने पाहता या योजनेची अंमलबजावणी मिशन मोडवर करण्याची आवश्यकता निर्माण झाली.

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’चे सुधारित स्वरूप निश्चित करण्यासाठी महानिर्मिती, महावितरण व महापारेषण कंपनी, महाऊर्जा तसेच पीडब्ल्यूसी संस्था यांच्या प्रतिनिधींचा एक अभ्यासगट प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आला. या अभ्यासगटाने विविध शिफारसी आणि मिशन 2025 संदर्भात प्रयास संस्थेचा अहवाल विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या शेतीपंपाना दिवसा वीज पुरवठा करण्यसाठी तसेच कृषी फिडर्सचे सौर ऊर्जीकरण मिशन मोडमध्ये करण्याच्या दृष्टीने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला.

या अभियानामध्ये ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ अधिक सक्षम आणि सुव्यवस्थित करणे, सन 2025 पर्यंत कृषी वीज वाहिनीचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी तांत्रिक, आर्थिक कार्यपद्धती आणि देखरेखीचा आराखडा तयार करणे आणि शेतकऱ्यांना दिवसा अखंडीत व शाश्वत वीजपुरवठा करणे आणि किमान 7 हजार मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता निर्माण करणे, ही उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली.

या अभियानांतर्गत विकेंद्रित प्रकल्प आस्थापित करण्यासाठी वीज उपकेंद्रांच्या परिघातील जमिनीची उपलब्धता, ग्रीड कनेक्टिव्हिटी आणि प्रकल्पाचे आकारमान हे महत्त्वाचे घटक आहेत. हे घटक परिस्थितीनुरूप बदलत असतात. यासाठी काही तरतुदींचा अवलंब करण्यात आला. जसे 0.5 ते 10 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करून ते 11 केव्ही/22 केव्ही स्तरावर जोडणे, 5 ते 25 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करून ते 33 केव्ही स्तरावर जोडणे, ग्रीड कनेक्टीव्हिटी उपलब्ध असल्यास उजनी, जायकवाडी व इतर जलाशयांवर व्यवहार्यतेच्या अधीन राहून 10 ते 50 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प 11 केव्ही / 22 केव्ही / 33 केव्ही स्तरावर जोडणे, प्रकल्प समूह तयार करणे अशा विविध तरतुदींचा अवलंब करण्यात आला.

या अभियानासाठी पडीक जमिनीची आवश्यकता असल्याने ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी वीज उपकेंद्रापासून जवळच्या परिघातील खाजगी जागा निश्चित करून सौर ऊर्जा प्रकल्पास उभारण्यास द्यावी, असे ठरविण्यात आले. यासाठी प्रकल्पासाठी शासकीय जमिनी नाममात्र रूपये एक या दराने 30 वर्षाच्या कालावधीकरिता भाडेपट्याने आणि पोटभाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत खाजगी जमीन भाडेपट्ट्यावर घेताना त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या 6 टक्के दरानुसार परिगणीत केलेला दर किंवा प्रतिवर्ष 1 लाख 25 हजार रूपये प्रती हेक्टर यापैकी जी रक्कम जास्त असेल ती रक्कम पायाभूत वार्षिक भाडेपट्टा दर म्हणून गृहीत धरण्यात आला. अशा प्रकारे प्रथम वर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टा दरावर प्रत्येक वर्षी 3 टक्के सरळ पद्धतीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत प्रकल्पाची क्षमता कमी असल्यामुळे प्रकल्प आस्थापनेचा खर्च वाढतो व प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता कमी असते. तरीही कृषी क्षेत्रात सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्याची गरज लक्षात घेता अशा प्रकल्पांना चालना देण्यासाठी विकासकांना प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य देण्याचे ठरले. तसेच या अभियानात भाग घेणाऱ्या विकासकांना नाबार्ड, इरेडा, सार्वजनिक बँकाकडून माफक दराने प्रकल्प निधी मिळण्यासाठी शासनाने आवश्यक ती मदत केली.

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे अभियान हे महत्त्वाकांक्षी अभियान असल्याने नोडल एजन्सी, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, स्वतंत्र यंत्रणा, महाऊर्जा, प्रकल्प विकासक, स्थानिक प्रशासन, शेतकरी यांचे एकत्रित प्रयत्न झाले. यासाठी उपमुख्यमंत्री आणि उर्जामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. अभियानाची यशस्वी व जलदगतीने अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आली.

या अभियानाचा फायदे पाहता, या अभियानामुळे औद्योगिक व व्यावसायिक वीज ग्राहकांवर आकारण्यात येणारी क्रॉस सबसिडी कमी होऊन औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांच्या वीज दरात कपात, राज्याच्या विविध जिल्ह्यात मोठी गुंतवणूक आणि ग्रामीण भागात पूर्णवेळ आणि अर्धवेळ रोजगार निर्मिती होत आहे. महावितरण व महापारेषण कंपनीची वितरण प्रणाली सुद्धा बळकट झाली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना योग्य त्या भाराने वीज पुरवठा होण्यास मदत झाली. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी भाडेपट्ट्याने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना 25 वर्षाच्या कालावधीकरिता शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला आणि राहणीमानाचा दर्जा व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली. त्याचबरोबर सामाजिक फायदा सुद्धा झाला आहे.

– संजय डी.ओरके

विभागीय संपर्क अधिकारी (ऊर्जा)

Previous Post

बहीण भावाच्या नात्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात मी गमतीने ते बोललो – रवी राणा

Next Post

सहशिक्षिका अनिता तुकाराम दाणे जुंबाड सेट परीक्षा उतीर्ण

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सहशिक्षिका अनिता तुकाराम दाणे जुंबाड सेट परीक्षा उतीर्ण

सहशिक्षिका अनिता तुकाराम दाणे जुंबाड सेट परीक्षा उतीर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

June 20, 2025
‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 1, 2025
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

March 22, 2025
मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

March 3, 2025
मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

March 3, 2025
वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

March 3, 2025
धुळे : घरफोडी करणा-या अट्टल चोराला धुळे तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले

पंकज नगरात घरफोडी; रोख ५ हजार रूपयांसह लाखोंचे दागिने चोरून नेले

March 3, 2025
लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसलेल्या महिलेनं एका पिग्मी एजंटला २५ हजार रुपयांना लुटलं….

रात्री दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्या मुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले

March 3, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2024
0

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 26, 2024
0

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 23, 2024
0

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 19, 2024
0

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 17, 2024
0

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

Load More

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2025
0

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 30, 2024
0

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...

बार्शी विधानसभा २४६ मधील सकाळी ७ ते ९ मध्ये झालेले मतदान.

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी सुभाष देशमुख 94 हजार754 अमर पाटील 36हजार 724हजार

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group