तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड 15 ऑगस्ट भारत देश फक्त म्हणायला कृषीप्रधान देश असल्याचे म्हटले जाते. शेतीसाठी कोटी कोटीच्या योजना घोषित केले जातात, परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर या योजना पूर्णतः पोहोचत नाही आणि पोहोचल्या तर योजनेचा मूळ उद्देश साध्य होत नाही.एकंदरीत “च्यारण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला” म्हणण्याचा या योजना ठरतात. भारतात सर्वात जास्त शेतकऱ्यांची पिळवणूक व लुबडणूक होत असल्याचे विदारक चित्र कृषीप्रधान भारताचे दिसून येते. आणि हेच वास्तविक, विदारक आणि संताप जनक चित्र महासत्ता होत असलेल्या भारताचे दिसून येते.
शेतकऱ्यांची होणारी लुबडणूक व पिळवणूक अनेक शेतकऱ्यांच्या हक्काची योजना अमलात आणण्यासाठी केल्या जाणारा भ्रष्टाचार याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास अंबड पंचायत समिती म्हणता येईल. शेतकऱ्याला मंजूर करण्यात येणाऱ्या सिंचन विहिरीसाठी प्रत्येकी 30 हजार रुपये दर हा ठरलेला आहे. तर प्रति मस्टर काढण्यासाठी हजार रुपये हे सक्तीने पंचायत समितीतील भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना द्यावे लागतात असा अलिखित नियम ठरलेला आहे. आणि विशेष म्हणजे गट विकास अधिकारी सामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कधीकाळी जर कार्यालयात भेटले तर देव पावला असे म्हणता येऊ शकते?
आणि याच अत्यंत गंभीर प्रकाराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमरण उपोषण करत अंबड पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराविषयी चौकशीची मागणी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बळीराम तात्या खटके,पंडित बर्डे,महेश चोथे, विष्णू पुंड,नाहेड पाठवा, किस्मत सय्यद,बळीराम गोल्डे,भागवत दोडके आदी मनसैनिक व शेतकऱ्यांनी अंबड पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यात बाबत आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मनसेच्या वतीने केले जात असलेल्या उपोषणामुळे कदाचित शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक व लुबडनूक थांबेल हीच कृषी प्रधान भारत देशाच्या प्रशासन व राजकीय व्यवस्थेकडून अपेक्षा काही अंशी जरी पूर्ण झाली तरी भारत बदलत असल्याचे चित्र दिसून येईल