▶️”गेले वर्षीच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई जमा करा.”
तभा वृत्तसेवा
मुखेड प्रतिनिधी रणजित जामखेडकर
गेल्या ५० तासापेक्षा अधिक कालावधीपासून मराठवाड्यात नांदेड व मुखेड तालुक्यात सारखा पाऊस पडत असल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे.अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते,
पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.तरी प्रशासनाने बाऱ्हाळी,मुक्रामाबाद,जांब व अंबुलगा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद जाहीर केली आणि जाहूर,येवती,चांडोळा आणि मुखेड महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद दिली नाही.अतिवृष्टीने संपूर्ण मुखेड तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे.संपूर्ण मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची नुकसानभरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी सरकार व प्रशासनाकडे प्रत्यक्ष बाधित पिकांच्या शेतीतून शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केले आहे.
गेले वर्षी अतिवृष्टी व ढगफुटीने पिकांचे नुकसान व जमीन खरडून गेली होती.त्याची नुकसान भरपाई अजून बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाली नाही.त्यांना ती तात्काळ मिळावी.गेले वर्षी प्रशासनाने पंचनामे करतांना प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मधून वगळले होते,तसे प्रकार यावर्षी होऊ नयेत याची दखल तहसीलदार साहेबांनी घ्यावी असे मागणीत सांगितले आहे.