तभा फ्लॅश न्यूज/ढोराळा : जिल्हा प्रशासनाच्या ‘हरित धाराशिव’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत ढोराळा ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनासाठी मोठे पाऊल उचलले आहे. येथे १० गुंठे जमिनीवर विविध प्रकारच्या ३१०० झाडांची यशस्वी लागवड करण्यात आली.
शनिवारी (दि. १९ जुलै) महाराष्ट्र शासनाच्या ‘घनवृक्ष’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने एकाच दिवशी १५ लाख झाडांची लागवड करण्याचा निर्धार केला. या उपक्रमात ढोराळा ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या वृक्षारोपण मोहिमेत जिल्हा परिषद शाळा, संत गोरोबा काका विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सरपंच, तलाठी, बचतगटांच्या महिला व सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.
कार्यक्रमास नितीन भोसले, विष्णू नाईकनवरे, अशोक थोरात, पांडुरंग चौधरी, प्रल्हाद चौधरी, ग्रामसेवक अशोक निपाणीकर, मुख्याध्यापक विजय जायभाय, खांडेकर सर, शिक्षक आप्पासाहेब गोरे, जालिंदर बेलगुरे, उषाताई मुंडे, सुरेखा पालकर, सुवर्णा घंटे, स्वाती कऱ्हाळे, क्षीरसागर व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वृक्षारोपणाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, रोजगार सेवक, संगणक परिचालक, वाठवडा शाळेचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
या यशस्वी उपक्रमाबद्दल सरपंच छाया विलास थोरात यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व पर्यावरण रक्षणासाठी ग्रामस्थांनी पुढेही योगदान द्यावे असे आवाहन केले.