Friday, July 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सप्टेंबरमधील नुकसानीचे २९२ कोटी मंजूर, आजवर ४८१ कोटी प्राप्त…  मदतीचा तिसरा टप्पा अद्याप बाकी

तरुण भारतbyतरुण भारत
October 18, 2025
in maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे अभुतपूर्व नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या महायुती सरकारने जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी १८९ कोटी यापूर्वीच उपलब्ध करून दिले आहेत. त्याचे वितरणही युद्धपातळीवर सुरू आहे. गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील २९२ कोटी रुपयांच्या मंजुरीचा शासन आदेशही निघाला आहे. ही रक्कमही बाधित शेतकरी बांधवांच्या खात्यात तातडीने वितरित करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. खरवडून गेलेल्या जमिनीसाठी ४० कोटी रुपयांचा शासन आदेश आज निर्गमित होणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त दोन हेक्टरपेक्षा अधिक तीन हेक्टर पर्यंत ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना दिवाळीनंतर तिसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी आपल्या महायुती सरकारने १८९ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्याचे वितरणही सुरू आहे. अद्यापही काही ठिकाणी ही रक्कम प्राप्त झाली नसल्याच्या तक्रारी आपल्यापर्यंत येत आहेत. मात्र जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी अस्वस्थ होऊ नये आणखी वितरण प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच रक्कम आपल्या थेट खात्यात जमा होणार आहे. या पहिल्या मदतीच्या टप्प्यापाठोपाठ सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी दुसरा टप्प्यातील मदतीचे वितरणही आता लवकरच सुरू होईल. त्यासाठी गुरुवारी २९२ कोटी ४९ लाख २१ हजार ४६० रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय निघाला आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे तीन लाख ११ हजार २९१ हेक्टर २३ आर एवढे क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे चार लाख चार हजार ६५६ शेतकरी बांधवांना त्याचा फटका बसला आहे. त्यांना या नैसर्गिक संकटाच्या जोखडात बाहेर काढण्यासाठी २९२ कोटी ४९ लाख २१ हजार ४६० रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून १३ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला होता. तातडीने या सगळ्या बाबींचा पाठपुरावा करून काल १६ ऑक्टोबर रोजी म्हणजे तीन दिवसात आपण शासन आदेश काढून २९२ कोटी रुपयांच्या मदतीचा दुसरा टप्पा मंजूर करवून घेतला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. 

विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात जिल्ह्यात महापुरामुळे शेतजमीन खरवडून जाणे, जमीन खचणे, नदीपात्रातील जमीन वाहून जाणे आणि गाळ साचणे हे सगळे नुकसान भरून काढण्यासाठी ४० कोटी ४८ लाख दोन हजार ३५० रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे. जिल्ह्यातील ३३ हजार २६३ शेतकरी बांधवांचे आठ हजार ७७४ हेक्टर ४५ आर एवढ्या क्षेत्राला फटका बसला आहे. त्यासाठी आपल्या महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे ( खरडून गेलेल्या जमिनीसाठी रु.४७ हजार हेक्टर प्रमाणे व जमिनीत वाळूचा,गाळाचा ३ इंच थर जमा झाला असेल त्यासाठी रु.१८००० प्रति हेक्टर ) ४० कोटी ४८ लाख दोन हजार ३५० रुपयांच्या अनुदान मंजुरीचा शासन निर्णय आज अपेक्षित आहे. त्याव्यतिरिक्त रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या सगळ्या जमिनी पूर्ववत करण्यासाठी प्रति हेक्टर तीन लाख रुपये याप्रमाणे साधारणतः २७० कोटी रुपये आपल्या जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहेत. आपण यापूर्वीच ७५० कोटी रुपयांपेक्षा अधिकची मदत आपल्या जिल्ह्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपलब्ध करुन देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १८९ कोटी, गुरुवारी मंजूर झालेले २९२ कोटी आज अपेक्षित असलेल्या शासन निर्णयानुसार ४० कोटी आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुमारे २७० कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच दोन हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झालेल्या तीन हेक्टर क्षेत्रापर्यंतचे अनुदानही दिवाळीनंतर मिळणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Post Views: 32
Previous Post

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

Next Post

७५ बसस्थानकांवर मोफत “वाचन कट्टा” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

७५ बसस्थानकांवर मोफत "वाचन कट्टा" – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ताज्या बातम्या

मनविसेच्या वर्धापन दिन व राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठक

July 30, 2026
सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

July 30, 2026
श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

July 30, 2026

जुळे सोलापुरातील अत्याधुनिक नाट्यगृहाचा मार्ग मोकळा

July 30, 2026

सोलापुरात रंगला शाहिरी महोत्सव

July 30, 2026

सोलापुरात जपली जातेय जुनी म्हशी पळविण्याची परंपरा

July 30, 2026

यादवांना आठवले म्हणाले की आमच्यात या

July 30, 2026

राहल गांधींचा माईक बंदचा व्हिडीओ होतोय व्हायरल

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1014214

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!