देगलूर / नांदेड : तालुक्यातील नरंगल (बु) येथे भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री वीरभद्र स्वामी यात्रेनिमित्त यंदा गोविंद शंकरराव पाटील यांच्या शेतात काळ्या मातीत कुस्त्यांचा फड चांगलाच रंगला होता. या कुस्त्यांच्या फडात पालमचा आबु चाऊस आणि उदगीरचा निरज वाघमारे यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला तर द्वितीय क्रमांक जय चाऊस, तृतीय क्रमांक गजानन जाहूरकर आणि आयुब शेख यांनी पटकावले. यात यवतमाळची महिला कुस्तीपटू देवयाणी माने यांनी पुरुष कुस्तीपटूला धुळ चारत उपस्थितांना आश्चर्यचकित केले.
काळ्या मातीतील कुस्त्यांचा फडाचे उद्घाटन उत्कृष्ट कुस्तीपटू तथा देगलूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती मुंडे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्रुदेव पवार यांच्या हस्ते करण्यात आली तर शेवटच्या कुस्तीचे बक्षीस वितरण पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे म्हणाले की, नरंगलकरांनी कुस्तीचे सामने घेत भारतीय खेळाला चालना दिली आहे. कुस्तीपटूंनी केवळ स्पर्धा जिंकण्यापुरते मर्यादित न राहता राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव उज्ज्वल करावे असे सांगितले.
दरम्यान ही स्पर्धा दुपारी बारा ते सायंकाळी साढेसातच्या दरम्यान घेण्यात आली. या स्पर्धेत अतिशय चांगल्या कुस्तीपटूने सहभाग घेतला होता त्यावेळी ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली, अंतीम कुस्ती पालमचा आबु चाऊस आणि उदगीरचा निरज वाघमारे यांच्यात कुस्ती रंगली, ही लढत अत्यंत चुरशीची होती. शेवटी पंचांच्या निर्णयानुसार शेवटची कुस्ती विभागून देण्यात आली. तर या स्पर्धेत यवतमाळहून आलेली महिला कुस्तीपटू देवयाणी माने हीने पुरुष कुस्तीपटूला धूळ चारीत अवघ्या दोन मिनिटांत विजयावर शिक्कामोर्तब केले.
मागील दोन वर्षांपासून नरंगल (बु) येथे बंद पडलेल्या कुस्त्याचा फडाला गावकऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा चालू करण्यात आले. या फडासाठी गावातील तरुणांबरोबरच पंचक्रोशीतील लोकांनीही सहकार्य आणि मदत केली. तर महाराष्ट्रातील दर्जेदार कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवित चालना दिली. यंदा महाराष्ट्रातील उदगीर, लातूर, नळेगाव, पुसद, यवतमाळ, संभाजीनगर, कुर्डुवाडी, सोलापूर, पुणे, हिंगोली, मुखेड या ठिकाणासह तेलंगाणा आणि कर्नाटक राज्यातील कुस्तीपटूंनी सहभाग नोंदविला. तर कुस्त्यांच्या फडासाठी विरभद्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, महात्मा बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नरंगलचे संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव गोविंदराव पाटील यांच्यास्मरणार्थ 14051 रु., कै. इरवंतराव लिंगप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ 11000/- रू., कै. मोहम्मद नवाज पो. पटेल यांच्या स्मरणार्थ 5100/- रू., कै. गणपतराव राजेप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ 5001/- रू, कै. रंजिता मधुकर पाटील यांच्या स्मरणार्थ 5001/- रू तसेच श्री शंकर शिवलींगराव म्हेत्रे तमलूरकर यांच्यातर्फे 11551/- रू., श्री भुमन्ना नरसिंग गाडगे शहापुरकर यांच्या तर्फे 7000/- रू., श्री डॉ. आनंद नरंगलकर यांच्या तर्फे 5000/- रू, श्री. सतीश तारकांत पाटील यांच्याकडून रु. 5000/-, श्री रामराव विठ्ठलराव वाघमारे नंदूरकर यांच्या तर्फे 5000/- रू., श्री प्रा. नरेंद्रकुमार विठ्ठलराव वनंजे तमलूरकर कथा तर्फे 5000/- रू., तलाठी श्री संतोष राचन्ना पाटील यांच्या तर्फे 5000/- रू, सरपंच सौ. शोभा अरविंद कर्णे यांच्या तर्फे 5000/- रू. श्री गजानन रामराव तंबाके यांच्या तर्फे 5000/- रू. देणगी देण्यात आली तर यांच्यासह अनेकांनी मदतीचा हात पुढे केला.
ही स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली. या कुस्ती समिती मंडळ अध्यक्ष मारोती भीमराव पाटील, उपाध्यक्ष रामलु कोरटे व रफिक पटेल, सचिव दत्तात्रय कंदलवार, दिलीप गायकवाड, सहसचिव ज्ञानेश्वर म्याकलवार, नरसिंग करे, कोषाध्यक्ष नरेश कर्णे, संतोष नल्लामडगे, कार्याध्यक्ष सायलू सुरावार, नागनाथ कऱ्हाडे, कार्याध्यक्ष अंबादास कऱ्हाडे, विजय कंदलवार, राजू शंकरराव पाटील, माजी सरपंच यशवंत शंकरराव पाटील, व्यंकट शंकरराव पाटील, गोविंद शंकरराव पाटील, अशोकराव गोपछडे, अॅड रवींद्र पाटील, संतोष पाटील, कैलास हसनाळे, अंबादास पाटील, अॅड संजय देशमुख, देवेंद कऱ्हाडे, व्यंकटराव पाटील, बालाजी पाटील, प्रकाश कर्णे,आनंद कऱ्हाडे, खाजामिया शेख, राम सिद्धपा पाटील ,यादव कऱ्हाडे, यादव कांबळे, काशिनाथआप्पा स्वामी, मिलींद वनंजे, व्यंकटराव पाटील, माधव कर्णे, गंगाधर कुऱ्हाडे, राजू पाटील, जगदीश कऱ्हाडे, हुल्लाजी भालके, जगदीश कऱ्हाडे, राजू पाटील, संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तर या स्पर्धेचे सुत्रसंचलन शाहिर माणिक कोकले आणि उत्तम वनंजे यांनी केले तर पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्रुदेव पवार, पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड, उपनिरीक्षक महाजन मैसनवाड, पोलीस जमादार मोहन कनकवले, पोलीस जमादार बालाजी पुरी, पोलीस हवालदार कृष्णा तलवारे, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव वानरे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल अटकोरे, पोलीस कॉन्स्टेबल बळीराम घुळे आदींनी शांततेत पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.
























