सोलापूर : जिल्हा स्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत एकत्रित कर्मचारी गेल्या २० वर्षापासून काम करीत आहेत. या कर्मचारी यांना ग्राम विकास विभागात कायम करण्यात यावे. याबाबत छत्रपती संभाजीनगर मॅट न्याय प्राधिकरण यांनी कायम करण्याचे आदेश दिला आहे. याबाबत निवेदन सोलापूर जिल्हा परिषदेत ग्रामविकास व पंचायराज मंत्री जयकुमार गोरे यांनी पाणी व स्वच्छता कर्मचारी कृती समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी दिले.
सोलापूर जिल्हा परिषदेत आज राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची कामाचा आढावा घेण्यासाठी आले होते.
या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अमोल जाधव, शंकर बंडगर, यशवंती धतु्रे, दिपाली व्हटे, प्रतीक्षा गोडसे, सचिन सोनवणे, महादेव शिंदे, प्रशांत दबडे, आनंद मोची, यांचे सह अभियान कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.सर्व कर्मचारी यांना ग्राम विकास विभागात कायम करून आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदन देऊन केली.
























