नांदेड ते बिदर फूलवळ मार्गे राष्ट्रीय महामार्ग 50 या रस्त्यावर काही दिवसातच जागोजागी मोठमोठाल्या व लांबच लांब भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या कामाबद्दल परिसरातील नागरिकाकडून संताप व्यक्त केला जात आहे. नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्ग फूलवळ गावातून गेल्याने नागरिकांना उदगीर, लातूर,नांदेड येण्या-जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत जवळचा व सोयीचा बनला आहे.
दररोज प्रचंड प्रमाणात वाहनाची या रस्त्यावरून ये जा असते. चार वर्षापासून सुरू असलेल्या या कामातील फुलवळ मध्ये रस्त्याचे काम अर्धवट राहिलेले आहे. अर्धवट राहिलेल्या कामामुळे रस्त्यावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असतानाच उर्वरित अर्धवट काम पूर्ण करावे अशी कित्येक दिवस झाली मागणी केली जात आहे. पण या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कंपनीने या मागणीकडे साप दुर्लक्ष केल्यांचे आतापर्यंत दिसून आले आहे. गावकरी रस्त्यावर उतरल्यावरच संबंधित विभागाला आणि कंपनीला जाग येणार असेल तर गावकऱ्यांनी सुद्धा आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
मोठ्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा येथील नागरिकांची होती. मात्र काही दिवसातच या रस्त्याच्या अवस्थेमुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी दर्जेदार रस्ते करा अन्यथा कारवाई करू अशी तंबी वारंवार गुत्तेदारांना देत असतात, मात्र या तंबीनंतरही गुत्तेदारावर काहीच फरक पडलेला दिसून येत नाही.
विशेष 24 फेब्रुवारी रोजी रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांचा नांदेड दौरा करून सुद्धा फुळवळ येथील कामाला काही गती आली नाही. माननीय नितीन गडकरी साहेबांनी या राष्ट्रीय महामार्ग रस्ता 50 क्रमांकाचे काम करणाऱ्या कलथीया एजन्सी वर कार्यवाही करून सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड मार्फत या रस्त्याची गुण नियंत्रक विभागातर्फे चौकशी करण्याच्या आदेश देते का? आता या कामाच्या अवस्थेनंतर संबंधित गुत्तेदारावर कारवाई होईल का, असा प्रश्न यानिमित्ताने नागरिक उपस्थित करत आहेत.