
सोलापूर – येथील पुष्प जिमखाना, डोणगाव रोड मैदानावर निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी आयोजित इंटर क्लब क्रिकेट स स्पर्धेत चुरशीच्या सामन्यांमध्ये वॉरियर्स आणि किंग्स या संघांनी अनुक्रमे विजय मिळवले.
पहिल्या सामन्यात वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १३१ धावा उभारल्या. यात यशराज टेकाळे याने २७, पियुष खांडेकर याने १५ तर आदित्य सुरवसे याने ११ धावांचे योगदान दिले. नकुल होनमान आणि दुर्वांक पाटील यांनी प्रत्येकी ७ धावा केल्या. रायडर्स संघाकडून गोलंदाजी करताना अथर्व हलकुरकी आणि स्वप्निल चव्हाण यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर अथर्व मांडवेकर, मल्हार गायकवाड आणि झिशान नदाफ यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. प्रत्युत्तरात १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रायडर्स संघाला २० षटकांत ८ बाद ८४ धावांपर्यंतच मजल मारता आली. रायडर्सकडून धानेश्वरी घोडके हिने २१ आणि अकिरानंदा कुशपागो याने ११ धावा केल्या. वॉरियर्स संघाकडून गोलंदाजी करताना विराज टकले, आदित्य चटके आणि राजन सर्वगोड यांनी प्रत्येकी दोन, तर मल्हार होनमाने आणि आदित्य सुरवसे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. हा सामना वॉरियर्स संघाने ४७ धावांनी जिंकला. या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आदित्य चटके याला सामनावीर, यशराज टेकाळे याला फलंदाज तर विराज टकले याला गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. आदित्यला डॉ. अमरसिंग शेंडे यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आले.
दुपारच्या सत्रात झालेला दुसरा सामन्यात लायन्स विरुद्ध किंग्ज यांच्यात खेळवला गेला. लायन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना किंग्ज संघाने २७.४ षटकांत सर्वबाद १८६ धावा केल्या. यामध्ये हर्ष राऊत याने ४३, संग्राम पवार याने ३५ तर सुरज थोरात याने १९ धावा केल्या. लायन्स संघाकडून गोलंदाजी करताना श्रवण माळीने अवघ्या १९ धावांत ४ बळी घेतले. अभिजीत सरवदे याने २४ धावांत ३, यश पवारने ४३ धावांत २ तर अर्जुन चटके याने २७ धावांत १ बळी घेतला. विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या किंग्ज संघाने २८.५ षटकांत ९ बाद १८८ धावा करत १ गडी राखून अत्यंत रोमांचक विजय मिळवला. किंग्जकडून श्रवण माळीने नाबाद ४७, विराज पांढरेने नाबाद ४१ तर यशराज श्रीरसागरने ३४ धावांची मॅचविनिंग खेळी केली. लायन्सकडून गोलंदाजी करताना गणेश पवारने २५ धावांत ४ बळी घेतले. अनिश बिरोळी व सुरज थोरात यांनी प्रत्येकी दोन, तर आर्यन भूमकर आणि सार्थक कन्ना यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या श्रवण माळी याला सामनावीर, फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज अशा तिन्ही पुरस्कारांनी निलेश गायकवाड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
























