पंढरपूर – आषाढी एकादशी निमित्त परंपरे प्रमाणे विठ्ठलाची रथयात्रा शहरातील नगरप्रदक्षिणा रस्त्यावरुन मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय काढण्यात आली. या रथयात्रेचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांनी नगरप्रदक्षिणा रस्त्यावर प्रचंड गदी केली होती. आषाढी व कातिर्क एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येने भाविक येथे येत असतात. सर्वच भाविकांना एकादशी दिवशी विठुरायांचे दर्शन घडत नसते. त्यामुळे आषाढी आणि कातिर्की एकादशीच्या सोहळ्यासाठीयेथे आलेल्या प्रत्येकाला विठ्ठलाचे दर्शन घडावे यासाठी बऱ्याच वषार् पासून रथयात्रेचा उत्सव सरु करण्यात आलेला आहे. या रथयात्रे मध्ये विठ्ठल, राही आणि रखुमाईच्या मुती असतात. दरम्यान येथील माहेश्वरी (पूवीर्ची खासगीवाले) धर्मशाळे पासून रविवारी दुपारी या रथयात्रेस सुरुवात झाली. त्या अगोदर माहेश्वरी धर्मशाळे मध्येविठ्ठल, राही आणि रखुमाईंच्या मुतीर्वर सकाळी अभिषेक करुन विधीवतपुजा करण्यात आली. नातू, रानडे आणि देवधरया रथावरील मानकऱ्यांनी विठ्ठल, राहि आणि रखुमाईंच्या मुर्तीरंगीबेरंगी आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथावर नेवुन ठेवल्या. त्यानंतर या रथयात्रेस सुरुवात करण्यात आली. रथयात्रा ज्या प्रदक्षिणा मागार्वरुन मार्गक्रमण करीतअसते त्या मागार्वर बऱ्याच ठिकाणी नागरिकांकडून रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या. रथयात्रेच्या अग्रभागी अश्व होता तसेच बँण्ड पथक देखील होते. विविध संतांचे अभंग या बँण्डपथकातील कलाकार वाजविता होते. ही रथयात्रा पाहण्यासाठी नगरप्रदक्षिणा मागार्वर वारकऱ्यांची तसेच स्थानिकनागरिकांची दोन्ही बाजूला गदीर् केली होती.ऱथयात्रेवर खारीक उधळण्याची परंपरा आहे. त्यामुळे खारकांची विक्री करणारे बरेचविक्रेते या नगरप्रदक्षिणा रस्त्यावर रथ येण्या अगोदर विक्री करण्यासाठी फिरताना दिसतहोते. रथ जवळ आल्यानंतर त्याचे दर्शन घेवून भाविकांकडून मोठ्या श्रध्देने त्यावर खारकांचा वषार्व केला जात होता. अनेक भाविक,स्थानिक नागरिक नगरप्रदक्षिणा रस्त्यावरील असलेल्या मठ, धर्मशाळा तसेच घरांच्या गच्चीवरुन रथयात्रेचा हा सोहळा पाहून विठ्ठलाच्या दर्शनानेमनोमनी त्रुप्त होताना दिसत होते. दरम्यान माहेश्वरी धर्मशाळे पासून निघालेली ही रथयात्राकालिकादेवी चौक, काळामारुती, चौफाळा,नाथचौक मागेर् पुढे पुढे मार्गक्रमण करीत होती. अखेर माहेश्वरी धर्मशाळेजवळ ही रथ यात्रा पोहचल्यावर या रथावरील उत्सवमुतीर्पुन्हा धर्मशाळेत नेण्यात आल्या. त्या ठिकाणी पुन्हा या मुतीर्चीआरती होवून त्या मुळजागी ठेवण्यात आल्या. या नंतर या रथयात्रा उत्सवाची सांगता झाली. या वेळी भाविकांना प्रसादाचे देखील वाटप करण्यात आले.
Post Views: 15