पंढरपूर तलावातील पाणी पातळी अगदी तळाशी गेली आहे. तलावात दोन ते तीन फूट एवढे अत्यल्प पाणी असून, लाभक्षेत्रातील १२ गावांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत आहे. तलावात नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील १२ गावे आणि सुमारे ४ हजार हेक्टर शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
एक टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या आणि १२ गावांतील सुमारे ४ हजार हेक्टर शेतीच्या पाण्याचा आणि पिण्याच्याही पाण्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या तिसंगी तलावात केवळ दोन-अडीच फूटच पाणी आहे. तलावाच्या आउटलेट गेटजवळ पाणी दिसत नाही. पावसाळ्याचे दोन महिने पूर्ण झाले आहेत. तिसंगी तलावाच्या लाभक्षेत्रात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे तिसंगी तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी यंदा पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील चार वर्षे तलाव १०० टक्के भरला होता. लाभक्षेत्रातही चांगला पाऊसही झाला होता. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला होता. परंतु यंदा पावसाळ्याचे दोन महिने संपले तरी पाऊस नसल्याने पाणी तळात आहे. तरीही २२ जुलैपासून नीरा उजवा कालव्यातून तिसंगी तलावात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र यंदा 8 ऑगस्ट आलेला असतानाही तलावात पाणी सोडण्याची कसलीही शक्यता दिसत नाही. शहाजी पाटील यांच्या मतदारसंघात पाणी सुरू नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात सांगोला विधानसभा मतदारसंघातील ८० टक्के भाग आहे. त्यात पंढरपूर तालुक्यातील सात गावांचा समवेश आहे.