पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांतील शेतीसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पाणीसाठा खूपच कमी आहे. यंदाचा पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले आहेत. धरण साखळी क्षेत्रात पर्जन्यमान कमी झाले आहे, त्यामुळे पाणीसाठा खूपच कमी आहे.उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीसह सोलापूर, बारामती, इंदापूर येथील औद्योगिक वसाहतींसह पुणे, सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यांतील शहरांनाही उजनीतून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे येथील नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. तर मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच उजनी धरण शंभर टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने भरले होते.
उजनी धरण परिसरात पाऊस कमी असला तरी पुणे परिसरातील धरणसाखळीतील पावसावर भीमा नदीवाटे उजनी धरण शंभर टक्के भरते. यंदाच्या पावसाळ्यात धरणसाखळीत पर्जन्यमान कमी होत आहे. त्यामुळे धरणसाखळीतील छोटी-मोठी धरणे भरल्यानंतरच पाणी उजनी धरणात पोहोचणार आहे. उजनी धरणाची क्षमता १२३ टीएमसी, तर १११ टक्के अधिकतम पाणीसाठवण क्षमता आहे.