Sunday, September 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संगीत क्षेत्रातील आणखी एक तारा निखळला ,विठ्ठल क्षीरसागर यांचे दुखःद निधन….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 18, 2024
in solapur
0
संगीत क्षेत्रातील आणखी एक तारा निखळला ,विठ्ठल क्षीरसागर यांचे दुखःद निधन….
0
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
” विठ्ठलराव क्षीरसागर “
ऐंशीच्या दशकात सोलापूरहून पुण्याला गणपती डेकोरेशन आणि मिरवणूक बघण्यासाठी पुण्याला ग्रुप ने जाण्याची सोलापुरात एक फॅशन होती . अश्याच एके वर्षी आम्ही कॉलेजची दहा बारा जणं पुण्याच्या डेकोरेशन बघत फिरत होतो . पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकातल्या एका गणपतीसमोर लायटिंग आणि त्या पाठीमागे एक ढोलकी , ढोलक आणि तबला अशी एक कॅसेट लावली होती . खणखणीत ढोलकीची थाप म्हणजे काय असतं , हे त्यावेळी मला समजलं . कॅसेट ज्याने लावली होती त्याला जाऊन विचारलं , त्याने सांगितलं ही , ढोलकी सम्राट श्री विठ्ठलराव क्षीरसागर यांची नुकतीच निघालेली ” ताल यात्रा ” नावाची कॅसेट आहे . त्यावेळी विठ्ठलराव क्षीरसागर हे सोलापूरचे आहेत हे पण माहीत नव्हतं . मी लगेच ती कॅसेट विकत घेतली नन्तर सोलापूरला आल्यावर त्यांना भेटलो . त्या काळात अखिल महाराष्ट्रात ती कॅसेट फेमस होती आणि आजही आहे !
1 सप्टेंबर 1943 साली विठ्ठलरावांचा जन्म सोलापूर येथे झाला , वडील बन्सी क्षीरसागर हे सनई वादक होते , त्यामुळे त्यांच्या बरोबर ताशा वाजवताना वडिलांनी त्यांची ही आवड लक्षात घेऊन त्यांना , श्री भीमराव कनकधर यांच्याकडे तबला वादनाचे शिक्षण घेण्यासाठी पाठवले . तबल्याचे शिक्षण चालू असताना अर्थार्जनासाठी त्या काळातील नळदुर्ग येथील गज़ल गायिका , मुमताज बेगम यांच्या बरोबर त्यांनी साथ केली , ती साथ करताना त्यांना काही काळ , इंदोर येथे वास्तव्याला राहावे लागले . त्या काळात त्यांनी उस्ताद ” जहांगीर खां ” साहेबांचे शिष्य , उस्ताद ” धुलजी खां ” यांच्याकडे आपली तालीम सुरू ठेवली . परत सोलापूरला आल्यावर , ते भीमराव कनकधरांचे
” गंडाबंध ” शिष्य झाले . भीमराव दादांचे गुरुबंधू , ” दाऊद खां ” यांचंही मार्गदर्शन त्यांना लाभलं . दादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्टेज वर कायम हसतमुख असतात , आदरातिथ्य , घरी आल्यागेल्याची आपुलकीने चौकशी करणे , इतक्या मोठ्या , नावाजलेल्या माणसात हे सगळे गुण ही त्यांच्या मोठेपणाची साक्ष आहे . कधीही घरी गेलो की पहिला प्रश्न असतो , ” जेवलास का ? लगेच काकूंना ऑर्डर , ए त्याचं जेवायचं बघ ” त्यांच्या घरी काकूंनी कित्येकवेळा रात्री बेरात्री कार्यक्रमांमुळे जाणं व्हायचं , पण त्या माउलीने आम्हाला रात्री स्वैपाक करून जेऊ घातलेलं आहे .
दादा आणि मी साधारण चौऱ्यांशी साली नोकरीला लागलो , ते आकाशवाणी पुण्याला स्टाफ आर्टिस्ट म्हणून जॉईन झाले , त्यावेळी
” विठ्ठलराव ” साथीला असतील तरंच आम्ही रेकॉर्डिंग करतो असं कित्येक मोठ्या गायकांनी सांगितलं होतं . त्या काळात
” लाईट म्युझिक ” ला तबला वादक म्हणून दादा खूप फेमस होते , गज़ल बरोबर तबला वाजवणारं एकमेव प्रख्यात नाव ” विठ्ठल क्षीरसागर ” यांचं होतं . त्यामुळं बऱ्याच गझल गायकांशी आमचा जवळून संपर्क आला . बऱ्याच गज़ल गायकांचे कार्यक्रम त्यांनी सोलापुरात घडवून आणले . पंडित भीमसेन जोशी , वसंतराव देशपांडे , कुमार गंधर्व , लक्ष्मी शंकर , श्रीमती निर्मला देवी , पंडित जसराज , शोभा गुर्टू यांच्या गायना बरोबर त्यांनी समर्थपणे साथ केलेली आहे . पंडित उल्हास बापट , पंडित
सतीश व्यास , एन. राजम , उस्ताद फैय्याज हुसेन खां , उस्ताद उस्मान खां , उस्ताद अब्दुल हलीम जाफर खां , यांच्या सोबतच्या वाद्य संगीताच्या मैफिली पण त्यांनी गाजवलेल्या आहेत . ढोलकी म्हणजे त्यांची खरी ओळख , ढोलकीवर त्यांचा हात पडला की असं वाटायचं , ती ढोलकी आता बोलायला लागणार आहे ! त्यांचा ढोलकीच्या सोलो वादनावर तर अख्खा महाराष्ट्र तेव्हा फिदा होता , त्याच काळात त्यांनी , विठाबाई नारायणगावकर , सुलोचनाबाई चव्हाण , रोशनबाई सातारकर या लावणी साम्राज्ञी बरोबर सुद्धा खूप कार्यक्रम केले होते . सुमारे सव्वाशे मराठी चित्रपटात , तीस कानडी चित्रपटात आणि वीस हिंदी चित्रपटात त्यांनी वाद्य साथ केली आहे . रामचंद्र चितळकर उर्फ सी. रामचंद्र यांच्या ” घरकुल ” या चित्रपटातील ” मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे ” या आशाबाईंनी अजरामर केलेल्या गाण्याला सुद्धा , दादांची साथ तर आहेच , पण हे गाणं चित्रित करताना त्यात सहभागी होण्याचा बहुमान सुद्धा त्यांना मिळाला आहे !
राम कदम यांच्या बरोबर त्यांची सांगीतिक मैत्री होती , रामभाऊंच्या बऱ्याच चित्रपटात दादांनी तबला ढोलकी वाजविली आहे , त्यात अतिशय गाजलेल्या , डॉक्टर श्रीराम लागू आणि संध्या यांच्या ” पिंजरा ” या चित्रपटाचा नामोल्लेख करावाच लागेल .
संगीत दिग्दर्शक वसंत पवार , सी . रामचंद्र , राम कदम , विश्वनाथ मोरे , बाळ पळसुले यांच्या बरोबर त्यांनी बरीच वर्षे चित्रपट सृष्टीत काम केलेले आहे . ” केला इशारा जाता जाता ” ” एक गाव बारा भानगडी ” अशा अनेक चित्रपटासाठी त्यांनी वाजवलं आहे . दादांच्या सांसारिक आयुष्यातही त्यांनी कुणाला काही कमी पडू दिलं नाही , चार मुलींची यथोचित वेळेला चांगल्या घरात लग्न लावून दिली ,अर्थात ह्या सगळ्यात त्यांना काकू ( शकुंतला क्षीरसागर ) यांची समर्थ साथ आहेच , दादां कार्यक्रमानिमित्त दौऱ्यावर असतांना संसाराचा भार काकूंनीच संभाळलाय . घरी आल्यागेल्याची अगदी आपुलकीने चौकशी त्या करतात . रवींद्र क्षीरसागर हे दादांचे चिरंजीव सध्या , एस.एन.डी.टी महाविद्यालयात तबला ह्या विषयाचे प्राध्यापक आहेत , ते ही पुण्यातल्या बऱ्याच कार्यक्रमात आपली कला सादर करत असतात . रवी हा तबला अलंकार आहे शिवाय त्याने संगीतात एम. ए. सुद्धा केलंय . सध्या तबला ह्या विषयातील डॉक्टरेट मिळवण्याचा त्याचा अभ्यास चालू आहे . विठ्ठलरावांच्या तिसऱ्या पिढीत सुद्धा संगीताचे संस्कार पाहायला मिळतात , त्यांचा नातू सुयश सुद्धा आजोबांच्या आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन उत्कृष्ट तबला वाजवतो . पुण्यातल्या ग्रुप मध्ये तो ही वाजवतो .
विठ्ठलराव सध्या कोथरूड ला , रवींद्रच्या सहयोगाने ” सुयश तबला विद्यालय ” चालवत होते . ऐंशी वय असून सुद्धा सकाळी फिरायला जाणे आणि क्लास हा त्यांचा दिनक्रम सुरू होता , आज दिनांक १७ जानेवारी रोजी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झालं , ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो !
त्यांचे अंत्यसंस्कार उद्या सकाळी १० वाजता , पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत . ओम शांती !
Post Views: 164
Previous Post

प्रणिती शिंदेंनी खोटा प्रचार केला, अडचणी आणल्या, पण मी नाकावर टिच्चून प्रकल्प पूर्ण केला : माकप नेते आडम मास्तर

Next Post

महाराष्ट्रातील गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला मोठी गती देणारे नाविन्यपूर्ण उद्योग- व्यवसाय सुरु करण्यात येतील

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
महाराष्ट्रातील गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला मोठी गती देणारे नाविन्यपूर्ण उद्योग- व्यवसाय सुरु करण्यात येतील

महाराष्ट्रातील गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला मोठी गती देणारे नाविन्यपूर्ण उद्योग- व्यवसाय सुरु करण्यात येतील

ताज्या बातम्या

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

बार्शीतील दोघांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

September 19, 2026
श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

September 19, 2026
 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

September 19, 2026

बार्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफी द्या, शिवसेनेची मागणी

September 19, 2026

गौरी गणपती आरासमध्ये लावले पोलीसांच्या कार्याचे संदेश देणारे फलक

September 19, 2026
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1235070

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!