सोलापूर : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यामुळे मुला-मुलींना मोफत शिक्षण मिळाले. वंचित, उपेक्षित, पददलित समाजातील विद्यार्थ्यांनी कमवा व शिका तत्त्व प्रणाली आत्मसात केली. त्यामुळे युवकांची स्वावलंबी पिढी निर्माण झाली. कर्मवीरांच्या विचारांचा हाच आदर्श राज्यातील जनतेने घेतला. त्यामुळे प्रगतीची दिशा मिळाली, असे मत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी व्यक्त केले.
पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या 67 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर रयत शिक्षण संकुलाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उद्योजक केतन शहा होते. यावेळी नगरसेवक बिजू प्रधाने, समाधान आवळे, मंदाकिनी तोडकरी, ज्ञानेश्वर मॅकल, लक्ष्मी उद्योग समूहाच्या माधुरी पाटील, प्रा अमर देशमुख, प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, संशोधक नितीन अणवेकर, वसंत नागणे, प्रा महादेव बागल, ॲड राजन दीक्षित, माजी मुख्याध्यापक संजय जोशी, काशीबाई पुजारी, भीमराव पवार उपस्थित होते.
प्रास्ताविक रमेश वडवराव यांनी केले, सूत्रसंचलन गजानन गोरे यांनी केले तर आभार आण्णा दिक्षित यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अझहर शेख, अमोल अंधारे, देवदत्त पाटील, साजेदा बागवान, वंदना डांगे, प्रतिभा भोसले, योगेश तेली, वनिता होटकर, मीनाक्षी बिराजदार, अंजली परचंडे, महावीर आळंदकर, सुनीता पाटील यांनी प्रयत्न केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
रावजी सखाराम हायस्कूल प्रशालेचा निकाल 86.48 टक्के लागला असून प्रशालेत प्रथम क्रमांक यश राजू नवघरे, द्वितीय क्रमांक दिव्या अनिल कोने व तृतीय क्रमांक मुस्कान जाकीर अत्तार यांचा सत्कार उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.


























