मोडनिंब – मनुष्य हीच जात; माणुसकी हाच धर्म आहे. जात नाही आचरण असले पाहिजे असे प्रतिपदन बालयोगी वेदांताचार्य गोपाल महाराज कारखेडकर यांनी कथेच्या वेवीचनात सांगितले. मोडनिंब (ता.माढा) येथे भव्य संगीतमय भागवत कथेच्या समारोप सोहळ्यात त्यांनी सांगितले.
भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग, भक्तीमार्गात मन आणि इंद्रिय तर ज्ञानमार्गात मनाला मारावं लागत.मनाची, तनाची आणि वचनाची पवित्रता लागते. साधक अवशेष यम, नियम, आसन , प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा समाधी या गोष्टी असाव्या. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे धर्माचे तत्व आहेत. हे पाचही तत्व मनुष्य जीवन जगत असताना गरजेचे आहे. अहिंसा परमो धर्म:, हिंसा पाप आहे. शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी.जे जे इंद्रिय पाप करतात. त्यात्या इंद्रियांना त्या पापाचे प्रायश्चित्त भोगावे लागते.
यावेळी दृष्टांत सांगताना त्यांनी डोळ्यांनी फळ पाहिले, दातांनी ते खाल्ले, जिभेने त्याचा स्वाद घेतला; पणमार मात्र गालाला बसली आणि पाणी डोळ्यांतून आले.त्यामुळे आचरण आवश्यक आहे.जे जे करशील ते ते भरशील या वाचनाला विसरू नका. कोनाच्या भावना दुखवू नका. अभद्र बोलू नका. दुःख देऊ नका. निंदा करू नका. अपराध आहे.
क्षणोक्षणी हाचि करावा विचार | तरावया पार भवसिंधु. हा नरदेह मोठ्या भाग्याने प्राप्त झाला. आई वडिलांच्या पुणाईने प्राप्त झाला. पांडुरंगाच, सावतोबांच दर्शन घ्या.पवित्र तुळशीची माळ घाला.जगा आणि जगू द्या. एकादशीच व्रत पाळा.मोडनिंब येथील भागवत कथा सप्ताहाच्या सांगता दिवशी गोपाल महाराज कारखेडकर यांचा संयोजक व समस्त मोडनिंब ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपादबाबा यांच्या २८ व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त या संगीतमय सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.श्री संगनबसवेश्वर मठ येथे सप्ताह पार पडला.
अध्यात्मवादी बना
अध्यात्मवादी बना, जेंव्हा अध्यात्माची प्राप्ती होईल तेंव्हा जीवनात दुःख शिल्लक राहणार नाही.प्रकृती रक्षके धर्म: अर्थात प्रकृतीला सांभाळा. जगताच चिंतन केल्याने प्रकृती खराब होते.
कथा ऐकण्यासाठी दोन ते तीन हजार भाविकांचा सहभाग
मोडनिंब (ता. माढा) येथे सुरू असलेल्या संगीतमय भागवत कथेचा समारोप झाला. या सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आठवडाभर चाललेल्या या कथेच्या माध्यमातून बालयोगी गोपाळ महाराज कारखेडकर यांनी विविध अध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन केले. ९ एप्रिल पासून या सोहळ्याची सुरुवात झाली. १५ एप्रिल ला सांगता झाली. रोज सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात गिड्डूवाडी, मोडनिंब, अरण व बावी येथील दीड ते दोन हजार भाविक सहभागी होतात. मोडनिंब ग्रामस्थाच्या वतीने आयोजित या सोहळ्याचे यंदाचे यजमान सौ व श्री गणेश मस्के हे होते.
मोडनिंब येथील भागवत कथा सप्ताहाच्या सांगता दिवशी गोपाल महाराज कारखेडकर यांचा संयोजक व समस्त मोडनिंब ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


























